• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 13, 2015

नागरिकांचे आरोग्य १६ मजली इमारतीच्या अर्धवट बांधकामामुळे धोक्यात – सौ. रूपाली भगत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नागरिकांचे आरोग्य १६ मजली इमारतीच्या अर्धवट बांधकामामुळे धोक्यात – सौ. रूपाली भगत

 तात्काळ करण्याची गणेश भगतांची मागणी**
नवी मुंबई : नेरूळच्या राजकारणात महापालिकेच्या निवडणूकीत नेरूळ सेक्टर १६ हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही तब्बल १००० पेक्षा अधिक मताधिक्क्यांनी विजय मिळवित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत प्रकाशझोतात आल्या खर्‍या, पण नगरसेविका झाल्यावरही प्रभागातील नागरी समस्या निवारणात आक्रमकता दाखविल्याने नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांच्या नावाची नेरूळ पश्‍चिमच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.
नेरूळ सेक्टर १६ परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी या परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत यांनी सन २०१०च्या महापालिका निवडणूकीत पराभूत झाल्यावर या ठिकाणी भरीव स्वरूपात लोकोपयोगी कार्य करत जनसंपर्क वाढविला होता. स्थानिक भागात गणेशदादा भगतांचे कार्य आणि जनसंपर्क यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसला शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणे शक्य झाले.
नेरूळ सेक्टर १६ मध्ये सहा मजली इमारतीचे बांधकाम अनेक वर्षांपासून रखडले आहे. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. इमारतीसमोरील भूखंडावरही कचर्‍याचे ढीग तयार होत असून साफसफाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी केली आहे.
येथील महानगरपालिकेच्या शाळेसमोरील भूखंडावर इमारतीचे बांधकाम सुरू होते. सहा मजल्यापर्यंत काम झाल्यानंतर काही कारणास्तव बिल्डरने बांधकाम थांबविले. जवळपास ८ ते १० वर्षे अर्धवट अवस्थेमध्ये ही इमारत उभी आहे. पावसाचे पाणी इमारतीच्या छतावर साचत असल्यामुळे डासांची उत्पत्तीही होवू लागली आहे.तळमजल्यावर व समोरील मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. स्थानिक नगरसेविका रूपाली किस्मत भगत यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्‍न उपस्थित केला होता. या भूखंडाची साफसफाई करावी अशी मागणीही केली होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेशदादा भगत यांनीही यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. या भूखंडावरील कचरा साफ न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लवकरात लवकर याविषयी योग्य कार्यवाही करण्याची मागणी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी केली आहे.

Previous Post

दिवाळी सुटीत कोकणातील पर्यटकांची स्कूबा ड्रायव्हिंगला पसंती

Next Post

भारतीय शेअर बाजारातही घसरणीमुळे निराशेचे वातावरण

Next Post

भारतीय शेअर बाजारातही घसरणीमुळे निराशेचे वातावरण

इटीसी केंद्रातील विशेष विद्यार्थ्यांनी भिंतीचित्रातून साकारला स्वच्छता संदेश

इटीसी केंद्रातील विशेष विद्यार्थ्यांनी भिंतीचित्रातून साकारला स्वच्छता संदेश

काँग्रेसकडून बालदिनानिमित्त दिवाळी फराळचे आयोजन

काँग्रेसकडून बालदिनानिमित्त दिवाळी फराळचे आयोजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com