• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 14, 2015

इटीसी केंद्रातील विशेष विद्यार्थ्यांनी भिंतीचित्रातून साकारला स्वच्छता संदेश

adminbyadmin
in नवी मुंबई
0
इटीसी केंद्रातील विशेष विद्यार्थ्यांनी भिंतीचित्रातून साकारला स्वच्छता संदेश

नवी मुंबई : केंद्र सरकारमार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या पाहणीनुसार नवी मुंबईस देशातील स्वच्छ शहरांमध्ये तृतीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले असून टॉप टेन मध्ये असणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. हे मानांकन उंचावण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून लोकसहभागाला विशेष महत्व देण्यात येत आहे.
स्वच्छतेचा संस्कार विद्यार्थीदशेत असल्यापासून लहान वयातच मुलांवर झाला तर स्वच्छता ही सवय होईल आणि त्यातून शहराचे स्वच्छ व सुंदर भविष्य घडेल हे लक्षात घेऊन त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांपर्यंतही स्वच्छतेचा संदेश पोहचेल यादृष्टीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेच्या वतीने शालेय पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये वॉल पेन्टींग, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वर्ग व शाळा परिसर स्वच्छता अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.
याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या इ.टी.सी.अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राच्या विशेष विद्यार्थ्यांनी, केंद्र संचालक डॉ.वर्षा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली, आपल्या शिक्षकांच्या सहकार्याने, केंद्राच्या इमारतीतील एका भिंतीवर स्वच्छतेविषयी चित्रे काढून एक उत्तम संदेश जनमानसात प्रसारीत केला आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त शहर श्री. अंकुश चव्हाण, परिमंडळ 1 उपआयुक्त सुभाष इंगळे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान उपआयुक्त तृप्ती सांडभोर, इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांनी उपस्थित राहून विशेष विद्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहीत केले.
अशाच प्रकारचे अभिनव उपक्रम इतर शाळांतूनही राबविले जाणार असून यामध्ये नवी मुंबईतील प्रत्येक शाळेने स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे व विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयक जाणीव जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

भारतीय शेअर बाजारातही घसरणीमुळे निराशेचे वातावरण

Next Post

काँग्रेसकडून बालदिनानिमित्त दिवाळी फराळचे आयोजन

Next Post
काँग्रेसकडून बालदिनानिमित्त दिवाळी फराळचे आयोजन

काँग्रेसकडून बालदिनानिमित्त दिवाळी फराळचे आयोजन

पॅरिसमधील सर्व दहशतवाद्यांना सुरक्षा दलाकडून कंठस्थान

पॅरिसमधील सर्व दहशतवाद्यांना सुरक्षा दलाकडून कंठस्थान

पत्नीची हत्या करणारा रिक्षाचालक जेरबंद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com