• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 10, 2015

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा उद्धव ठाकरे – मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतरच होणार!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा उद्धव ठाकरे – मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतरच होणार!

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकमेकांची उणी-धुणी काढल्यानंतर आता भाजप-शिवसेनेत समीट होताना दिसत आहे. केडीएमसीत युती झाली. आता पुढेचे पाऊल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. भेटीचा मुहूर्त दिवाळीनंतर आहे. याभेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार आहे.
शिवसेना सत्तेत राहून विकासाच्या मुद्द्यावर भाजपला चांगलेच घेरत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत जमत नसल्याचे चित्र पुढे येत होते. याचा प्रत्यय महानगरपालिका निवडणुकांत दिसून आला. दोघांमध्ये कटुता निर्माण झाली. त्यामुळे संबंध ताणले गेले असतानाच तुटण्यापर्यंत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरुन भाजपचा टेकू काढण्याची भाषा केली.
जनतेची कामे होत नसलतील तर सत्ता हवेय कशाला, असा रोखठोक प्रश्न शिवसेनेने भाजपला केला. सेनेच्या मंत्र्यांनाच विश्वासात घेतले जात नसल्याचे मंत्र्यांचे गार्‍हाणे लक्षात घेऊन जनतेची कामे व्हावीत यासाठी कटुता टाळून दिवाळीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
सेनाभवनात शिवसेना आमदारांच्या आयोजित केलेल्या बैठकीत राज्यात सरकारमध्ये असूनही कामे होत नसल्याची तक्रार बहुतेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. तसेच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने या सर्वांवर दोघांमध्ये चर्चा होणार आहे.
वाढता दुरावा दोन्ही पक्षांसाठी मारक असून पुढील वर्षी राज्यात होणार्‍या दहा महापालिका निवडणुकीत याचा फटका दोन्ही पक्षांना बसू शकतो हे बिहारच्या निवडणुकीने दाखवून दिले. राज्यातील ग्रामपंचायती व नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीलाही भरपूर जागा मिळाल्यानंतर पुढील वर्षी होणार्‍या दहा पालिकांच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमधील कटुता संपणे आवश्यक असल्याचे दोन्ही पक्षांतील नेत्यांना वाटत असले, तरी पुढाकार कोणी घ्यायचा हा कळीचा प्रश्‍न होता.
या पाश्वभूमीवर कटुता सोडून समन्वयाची भूमिका घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला असून, दिवाळीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची ते भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना आमदारांच्या कामांची यादी घेऊनच उद्धव भेटणार सांगण्यात येत आहे.

Previous Post

अन्यथा केडीएमसीत शिवसेनेशिवाय आमची सत्ता होती : मुख्यमंत्री

Next Post

लंडनमध्ये ८७ वर्षीय महिलेला बसमध्ये २ मुलींकडून मारहाण

Next Post

लंडनमध्ये ८७ वर्षीय महिलेला बसमध्ये २ मुलींकडून मारहाण

कर्नाटकात टिपू सुलतान जयंतीवरून हिंसाचार

कर्नाटकात टिपू सुलतान जयंतीवरून हिंसाचार

बिहार पराभव लागलाय भाजपच्या जिव्हारी

बिहार पराभव लागलाय भाजपच्या जिव्हारी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com