• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 26, 2015

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीचे ‘हल्लाबोल’ आंदोलन

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीचे ‘हल्लाबोल’ आंदोलन

मुंबई : महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने आज मुंबईत थाळी नाद ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. मुंबई येथे सकाळी ११ वाजता थाळी नाद करीत सीएसीटी ते आझाद मैदान अशा काढण्यात आलेल्या मोर्चात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादी महिलाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार राहूल नार्वेकर या नेत्यांसह पक्षाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्यातील सरकार झोपी गेलेले आहे. झोपलेल्या या निष्क्रिय सरकारला जाग आणण्यासाठी आजचे थाळीनाद, हल्लाबोल आंदोलन करण्यात आले आहे, असं यावेळी तटकरे म्हणाले. तर, तिकडे पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्त्वाखाली दौंडमध्ये थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुळेंसह कार्यकर्त्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको केले. त्यामुळे पोलिसांनी सुप्रिया यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
महागाईमुळे जनता होरपळत आहे. सरकारतर्फे कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही. सर्वच अन्नधान्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. डाळीच्या साठेबाजांवर खूप उशीरा कारवाई करून आता दर कमी केल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र ही कारवाई किंवा उपाययोजना दोन महिन्यांपूर्वीच का केली नाही? असा सवालही तटकरे यांनी केला आहे.
महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या, केंद्रात भाजपा सरकार सत्तेत येऊन दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर राज्यात ३१ ऑक्टोबर रोजी भाजपा-शिवसेना सरकार आपला एक वर्षाचा कालावधी पूर्ण करीत आहे. सत्तेत येताच महागाई कमी करू असे आश्वासन सध्याच्या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिले होते. परंतु या वर्ष-दीड वर्षाच्या कालावधीत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई कमी होण्या ऐवजी दिवसेंदिवस ती वाढतच चालली आहे. राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता या महागाईच्या झळात होरपळत असताना सरकार मात्र संवेदनहीन बनून बघ्याची भूमिका घेत आहे.
सीएसटी समोर झालेल्या या आंदोलनात ‘सरकारची पोलखोल- पोलखोल, बोल, हल्ला बोल- हल्ला बोल’ अशा घोषणा देत व थाळी नाद करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Previous Post

गरज संपल्याने छोटा राजनला अटक : एम.एन सिंग

Next Post

स्मार्ट सिटीविषयी सूचनांकरीता महापालिका अधिकारी-कर्मचारीवृंदाने पुढाकार घ्यावा – महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे

Next Post
अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

स्मार्ट सिटीविषयी सूचनांकरीता महापालिका अधिकारी-कर्मचारीवृंदाने पुढाकार घ्यावा - महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे

पाटण्यात केजरीवालांचे काळ्या झेंड्यांनी स्वागत

नितीशजींनाच पुन्हा निवडून आणा - केजरीवाल

अबू सावंत बनणार छोटा राजन गँगचा म्होरक्या?

अबू सावंत बनणार छोटा राजन गँगचा म्होरक्या?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com