• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 4, 2015

कॉंग्रेसने सिडकोला घेतले फैलावर, अन्यथा आंदोलन अटळ

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कॉंग्रेसने सिडकोला घेतले फैलावर, अन्यथा आंदोलन अटळ

अनंतकुमार गवई
नवी मुंबई ः संजय भाटिया यांच्यावर दशरथ भगत यांनी एकूण १६ प्रश्‍नांची सरबत्ती केली आहे. या प्रश्‍नांची लेखी उत्तरे सिडको प्रशासनाने १७ सप्टेंबर २०१५ पर्यंत जनतेला दिली नाहीत तर सिडको विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दशरथ भगत यांनी दिला आहे.
सिडकोवर अवलंबून असलेल्या विविध हक्काच्या लाभार्थ्यांपैकी किती लाभार्थी दिले?, याची आकडेवारी लेखी स्वरुपात देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष दशरथ भगत यांनी ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
‘नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस’ने उपस्थित केलेल्या १६ प्रश्‍नांबाबत ‘सिडको’ने श्‍वेतपत्रिका काढावी,
अशी मागणी दशरथ भगत यांनी वाशीमधील कॉंग्रेस भवनमध्ये शुक्रवार , दि. ४ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेला २० हजार घरे नियमित करण्याचा राज्य शासनाचा जीआर एका महिन्यात आणून दाखवतो, अशी घोषणा भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केली होती. मात्र, त्यांची घोषणा अद्याप घोषणाच राहिली आहे. राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार फक्त घोषणाबाज सरकार आहे. घोषणा काय करता प्रत्यक्ष करुन दाखवा, असा टोलाही यावेळी दशरथ भगत यांनी लगावला.
सिडकोकडून नवी मुंबईतील पत्रकारांसाठी सिडको गृहप्रकल्पातील ५ टक्के घरे आरक्षित ठेवण्यात येत आहेत. त्याऐवजी ‘सिडको’ने नवी मुंबईतील पत्रकारांसाठी घरांच्या किंमतीत १० टक्के सवलत द्यावी, अशी मागणीही दशरथ भगत यांनी केली आहे.
‘सिडको’ने १९७० सालापासून ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील ९५ गावांतील शेतकर्‍यांची ३४४ चौ. कि.मी. क्षेत्रफळ जमीन केवळ ५० कोटी रुपयांमध्ये कवडीमोल दराने संपादित करुन नवी मुंबई शहर वसविले आहे. मग, नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना त्यांचा न्याय्य हक्क मिळण्यासाठी संघर्ष करण्यास सिडको प्रशासन का भाग पाडत आहे?, असा सवालही दशरथ भगत यांनी उपस्थित केला आहे. नवी मुंबई परिसरात घरे बांधणीच्या मुळ उद्दिष्ठांपासून सिडको आता दूर गेली आहे. सिडको आपली प्रकल्पग्रस्तांबाबतची भूमिका वेळोवेळी बदलत आहे, असेही भगत म्हणाले.
यावेळी ‘नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस’चे उपाध्यक्ष तथा प्रवक्ते दिपक दगडू पाटील, उपाध्यक्ष सुरेश नायडू, सरचिटणीस प्रकाश थळी, राजीव मिश्रा, चंद्रकांत जाधव, विठ्ठलराव यादव, सुधीर पवार, बाळकृष्ण बैले, रोजगार विभाग अध्यक्ष रविंद्र सावंत, युवक कॉंग्रेस सचिव शैलेश घाग आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

समाजाने शिक्षकी पेशाचा सन्मान करावा – राष्ट्रपती

Next Post

जनकल्याणच्या ११ लाखाच्या दहीहंडीचीच गोविंदा पथकांमध्ये चर्चा

Next Post
कुकशेतचा दहीहंडी महोत्सव ठरणार गोविंदा पथकांचे आकर्षण

जनकल्याणच्या ११ लाखाच्या दहीहंडीचीच गोविंदा पथकांमध्ये चर्चा

संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं निधन

मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १२.१०ची शेवटची लोकल

मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १२.१०ची शेवटची लोकल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com