• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 1, 2015

भारताचा श्रीलंकेत ऐतिहासिक मालिका विजय

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
भारताचा श्रीलंकेत ऐतिहासिक मालिका विजय

कोलंबो : तब्बल २२ वर्षांनी भारताने श्रीलंकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक मालिका विजय साकारला. अमित मिश्राने नुआन प्रदीपला शून्यावर पायचीत पकडून भारताची श्रीलंकेतील मालिका विजयाची दीर्घ प्रतिक्षा संपवली.
तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. १९९३ साली भारताने शेवटची मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेत १-० कसोटी मालिका जिंकली होती.
या विजयाचे वैशिष्टय म्हणजे भारताच्या युवा संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय साकारला. भारताने श्रीलंकेला विजयासाठी ३८६ धावांचे लक्ष्य दिले होते. भारताच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव २६८ धावात आटोपला आणि भारताने ११७ धावांनी मालिका विजय साकारला.
परेरा (७०) धावांवर बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा डाव गडगडला. शानदार शतक झळकवणार्‍या कर्णधार ऍजलो मॅथ्यूजला (११०) धावांवर इशांत शर्माने पायचीत पकडले. त्यानंतर रंगना हेरथला (११) धावांवर अश्विनने पायचीत केले. त्यानंतर धम्मिका प्रसाद सहा धावांवर बाद झाला.
भारतीय गोलंदाजांना त्रस्त करुन सोडणारी ऍजलो मॅथ्यूज आणि परेराची जोडी अखेर फुटली आहे. रविचंद्रन अश्विनने परेराला रोहित शर्माकडे झेल द्यायला लावून ही जोडी फोडली. परेराने (७०) धावा केल्या.
कर्णधार ऍजलो मॅथ्यूज अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. त्याने शानदार शतक झळकवले असून, नाबाद शतकी खेळीत त्याने तेरा चौकार लगावले. मॅथ्यूज-परेरा जोडीने सहाव्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली.
सिल्वा बाद झाल्यानंतर मॅथ्यूजला साथ द्यायला आलेला थिरीमाने (१२) धावांवर बाद झाला. त्याला अश्विनने लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. श्रीलंकेने १३० धावांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र त्यांना संघर्ष करावा लागत आहे.
मंगळवारी सकाळी पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर कौशला सिल्वाच्या रुपाने श्रीलंकेचा चौथा गडी बाद झाला. कालच्या धावसंख्येमध्ये फक्त तीन धावांची भर घालून (२७) धावांवर उमेश यादवने त्याला बाद केले.
भारत हळूहळू विजयाच्या समीप जात चालला असून, २२ वर्षानंतर श्रीलंकेत मालिका विजय भारताच्या दृष्टीक्षेपात आला आहे. सोमवारी भारताचा दुसरा डाव २७४ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावातील १११ धावांच्या आघाडीच्या बळावर भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी ३८६ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.
दुसर्‍या डावात श्रीलंकेचा संघ फलंदाजीला उतरल्यानंतर उमेश यादव आणि इशांत शर्माने भेदक गोलंदाजी करत प्रारंभीच त्यांना तीन धक्के दिले. श्रीलंकेसमोर भारताला कसोटीसह मालिका विजयापासून रोखण्याचे कठिण आव्हान आहे.

Previous Post

नारायणगावजवळ स्फोट; एक जण जखमी

Next Post

दिंडोशीवासीयांना मिळणार मोफत आधार कार्डचा आधार

Next Post
दिंडोशीवासीयांना मिळणार मोफत आधार कार्डचा आधार

दिंडोशीवासीयांना मिळणार मोफत आधार कार्डचा आधार

वरळीतील संकल्पची दहीहंडी रद्द

वरळीतील संकल्पची दहीहंडी रद्द

कामगार संघटनांची बुधवारी देशव्यापी बंदची हाक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com