• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 28, 2015

सिडकोने शेतकर्‍यांना उध्दवस्त केले- दशरथ भगत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सिडकोने शेतकर्‍यांना उध्दवस्त केले- दशरथ भगत

*** सिडको विरोधात ‘नवी मुंबई काँग्रेस’चे मुक निषेध आंदोलन***

** अनंतकुमार गवई **

नवी मुंबई: नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना साडेबारा टक्के भूखंड वाटप पूर्ण न करता फसवणूक करीत नैसर्गिक गरजेपोटी प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या घरांवर कारवाई आणि प्रसंगी पोलिसांत गुन्हे दाखल करणार्‍या सिडको प्रशासनाविरोधात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाचा निषेध करतानाच नैना प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांमध्ये जागृतीसाठी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस’च्या वतीने शुक्रवार, दि. 28 ऑगस्ट रोजी वाशीतील एक्झिबिशन सेंटरच्या गेटवर मुक निषेध आंदोलन करण्यात आले.
नागरिकांसह महामंडळाचे हित कसे जोपासतेय ते राज्य आणि केंद्र शासनास दाखवून स्वत:चे प्रमोशन करण्यासाठी सिडको प्रशासन धडपड करीत आहे. ज्याप्रमाणे ‘सिडको’ने ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकर्‍यांना फसविले आहे, त्याप्रमाणे आपण फसू नका, असा सावधानतेचा इशारा नैना प्रकल्पात बाधित होणार्‍या शेतकर्‍यांमध्ये जागृती करण्यासाठी ‘काँग्रेस’तर्फे सिडको विरोधात मुक निषेध आंदोलन छेडण्यात आल्याचे दशरथ भगत यांनी सांगितले. ‘सिडको’ने नैना प्रकल्प बाधित शेतकर्‍यांच्या/ग्रामस्थांच्या वित्तीय गुंतवणूक विषयक कार्यक्रमास सुरुवात होण्याअगोदर वाशीतील एक्झिबिशन सेंटरच्या प्रवेशद्वारावर सदर आंदोलन छेडल्याचे दशरथ भगत यांनी सांगितले.
1970 साली ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकर्‍यांच्या 100 टक्के जमिनी सिडको प्रशासनाने गुंतवणुकदाराच्या मानसिकतेतून अधिग्रहण केल्या. परंत, ‘सिडको’ने प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या भविष्यातील होणार्‍या नैसर्गिक कुटुंब वाढीसाठी इंचभर जागा देखील सोडलेली नाही. प्रकल्प बाधित शेतकर्‍यांचे पूर्ण पुनर्वसन होऊ नये या आकसापोटी पुनर्वसन प्रक्रियेसाठी जाचक अटी टाकून गुंता निर्माण करीत ‘सिडको’ने शेतकर्‍यांची आजपर्यंत फसवणूक करुन त्यांना उध्वस्त केले असल्याचा आरोप ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस’चे अध्यक्ष दशरथ भगत यांनी केला आहे.
वास्तविक पाहता जमीन अधिग्रहण करताना देण्यात आलेल्या आश्‍वासनानुसार ‘सिडको’ने प्रथम गावांचा विकास करुन नंतर शहर विकास करायला पाहिजे होता. पण, प्रत्यक्षात ‘सिडको’ने त्यांचे ब्रीदवाक्य ‘वुई मेकस् सिटीस्’ याप्रमाणे वागून सिडको विकसीत शहरातील गावे मागास ठेवलेली आहेत. त्यामुळे आता ‘सिडको’ने त्यांच्या मूळ आश्‍वासनानुसार जे करायला हवे ते ‘वुई डेव्हलप व्हिलेजेस अ‍ॅन्ड देन मेकस् सिटीस्’ यासाठी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस’च्या वतीने सिडको प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे.

Previous Post

आ.मंदा म्हात्रेंची सिडको एमडींसमवेत मरीना प्रकल्पाची पाहणी

Next Post

सामाजिक उपक्रमातून आमदार नरेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा

Next Post
सामाजिक उपक्रमातून आमदार नरेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा

सामाजिक उपक्रमातून आमदार नरेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा

स्वाजीलँडमध्ये सौंदर्य स्पर्धेत जाणार्‍या 38 मुलींचा मृत्यू

कॅटमुळे सुटली रणबीरची सिगारेट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com