नागपूर : देशाची दिशा आणि दशा बदलण्यासाठी तरुण महत्वाचे योगदान देऊशकतात. तरुणांनी आपल्या सामर्थ्याचा योग्य वापर करुन देशाच्या विकास प्रक्रियेतयोगदान द्यावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने विधानभवनातील विधानपरिषद सभागृहातआयोजित करण्यात आलेल्या संसदीय अभ्यासवर्गात ‘संसदीय कार्यप्रणाली व लोकशाहीसंवर्धनासाठी युवक चळवळींचे योगदान’ या विषयावर त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदारप्रणिती शिंदे, संगीता ठोंबरे, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आदी उपस्थितहोते. या अभ्यास वर्गात राज्यातील 11 विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासनविषयाचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले आहेत. मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा मलानेहमीच अभिमान वाटत राहिला आहे. न्यायमंडळ, कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ हीआपल्या लोकशाहीची तीन स्तंभे आहेत. पण आपल्या लोकशाहीने कुणालाही सर्वाधिकारदिलेले नाहीत. त्यामुळे इथे कुणीच मनमानी करु शकत नाही. घटनाकारांनी फार मोठीदूरदृष्टी ठेवून लिहिलेल्या संविधानामुळेच आपली लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट होऊशकली. राज्याच्या विधीमंडळात वेगवेगळ्या भागातून आलेले प्रतिनिधी आहेत. प्रत्येकाचीराजकीय, सामाजिक किंवा वैयक्तिक विचारधारा वेगवेगळी आहे. तरीही ते जेव्हाविधानमंडळात येतात तेव्हा प्रसंगी आपल्या वैयक्तिक विचारधारेला बाजूला ठेवून ते फक्तराज्याचा विकास आणि जनतेचे कल्याण यावरच सर्वांगीण चर्चा करतात. या संयमी आणि सहिष्णु विचारधारेमुळेच आपल्या लोकशाहीला वेगळी उंची प्राप्त झाली आहे , असे त्याम्हणाल्या. मागील काही काळात देशात फार मोठ्या घडामोडी घडत असताना देशातील तरुणांनीसंयमाची भूमिका घेतली. संयमी, विचारी आणि सहिष्णु वर्तनातूनच देशाचा सर्वांगीणविकास साधणे आपल्याला शक्य होणार आहे. आजच्या तरुणांनी याच मार्गाचा अवलंब करुनदेशाच्या विकासाच्या चळवळीला प्राधान्याचे स्थान द्यावे, असे त्यांनी सांगितले. **** सर्वसमावेशक विकासासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा – आमदार प्रणिती शिंदे आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आपली लोकशाही ही सर्वांना सामावून घेऊन पुढेवाटचाल करणारी आहे. इथे सर्वाधिकारी कुणीच नसून सर्व यंत्रणांचे एकमेकांवर नियंत्रणआहे. आजच्या तरुणांनी लोकशाही मार्गाने शासन यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढे येणेगरजेचे आहे. देशात काही चुकीचे घडत असल्यास त्याला अटकाव करण्यासाठीही तरुणांनीपुढाकार घेणे गरजेचे आहे. ज्या विषयात आपल्याला रस आहे अशा विषयाचा शोध घेऊनत्या क्षेत्रात झोकून देऊन काम करावे. विविधता ही आपल्या देशाची ताकद असूनसर्वसमावेशक विकासासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संयोजन विधीमंडळाचे अवर सचिव सुनिल झोरे यांनी केले. राष्ट्रसंततुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी मुन्ना लोणारे यांनी आभार मानले. 000000
Read moreदेशातील प्रत्येक प्रश्नाच्या निराकरणासाठी भारतीय लोकशाही व्यवस्था सक्षम नागपूर : आपल्या लोकशाहीची रचना अत्यंत आदर्शवत असून देशातील प्रत्येक प्रश्नाचे निराकरण करण्याची क्षमता संविधानाने दिलेल्या या लोकशाही व्यवस्थेत आहे. आजच्या तरुणांनी ही लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने विधानमंडळातील विधानपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संसदीय अभ्यासवर्गाच्या उद्घाटन समारंभात ते बोलतहोते. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, शिक्षण आणिसंसदीय कार्य मंत्री विनोद तावडे, आमदार ॲड. आशिष शेलार, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आदी मान्यवर उपस्थित होते. या अभ्यासवर्गात राज्यातील 11विद्यापीठांतील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, न्यायमंडळ, विधानमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे आपल्या लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत. सरकार म्हणून ओळखले जाणारे कार्यकारी मंडळ हे राज्यातील प्रत्येक प्रश्नासाठी विधानमंडळाला उत्तरदायी असते. याशिवाय राज्यात होणाऱ्या पै-न-पै खर्चाचा आढावा शासनाला विधीमंडळास सादर करावालागतो. त्यामुळे सत्ता निरंकुश होऊ नये यासाठी त्याला विधानमंडळास उत्तरदायी ठेवण्यात आले आहे. कायदे करणे हा विधानमंडळाचा सार्वभौम अधिकार आहे. सभागृहात अनेक महत्वाच्या कायद्यांवर 2 ते 3 दिवस चर्चा होते. महत्वाच्या कायद्यांवर...
Read moreनागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे होत असते. हे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या‘लोकराज्य’ या मराठी...
Read moreलोकराज्यच्या अधिवेशन विशेषांकाचे होणार प्रकाशन नागपूर : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी...
Read moreनागपूर : उत्कृष्ट संसदपटू, कुशल राजकारणी, अभिनेत्री आणि कठोर प्रशासक असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री श्रीमती जयललिता यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील प्रभावशाली...
Read moreमुंबई - महावितरणाच्या भोंगळ कारभाराच्या बातम्या नेहमी ऐकायला येत असतात. मात्र, या भोंगळ कारभाराचा फटका आता थेट प्रसीद्ध गायिका आशा...
Read moreअनेक वैशिष्ट्यांनी नटलेले गाव शहरांच्या कवेत आल्याने कधी कधी स्वत:तच हरविल्यासारखं वाटतं. मात्र त्यांच्यातील वेगळेपण हा एक आल्हाददायक प्रवास आहे....
Read moreसुजित शिंदे * सल्लागार निवडीसाठी साडेचार कोटी मोजणार * मुंबईकरांचा 440 एमएलडी साठा वाढणार * उद्या स्थायी समितीत होणार निर्णय...
Read moreश्रीगोंदा - नगर मतदारसंघाचे आमदार राहुल जगताप आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आता जनसामान्यांशी थेट संवाद साधणार आहेत.फेसबुक,ट्विटर आणि वेबसाईटचा वापर...
Read moreआपणा सर्वांना दिपावली सुखसमृध्दी व भरभराटीची जावो, ही विघ्नहर्त्या गणराया चरणी प्रार्थना!
Read more"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com
"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com