• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 25, 2015

गुरुवारपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
गुरुवारपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी न लावल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमधील पाण्याचा साठा आटत चालला आहे. त्यामुळे आता वर्षभराचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला असून मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येणार्‍या पाण्यात २० टक्के कपात करण्यात येणार आहे. मुंबईतील या पाणीकपातीसह ठाण्याला देण्यात येणारे पाणीही कमी करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत होणार आहे.
ऑगस्ट महिन्यातच पावसाने विश्रांती घेत घालवल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता चांगलीच वाढली आहे. तलाव क्षेत्रात पाऊस पडत नसल्यामुळे तलावातील पाण्याची पातळीत वाढ नाही. परिणामी वर्षभराच्या पाण्याचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्‍न महापालिकेपुढे असून तीन महिने कोणताही पाणीकपातीचा निर्णय न घेणार्‍या महापालिकेने आता कपात करण्याचा पक्का निर्धार केला आहे.
यासाठी २० टक्के सरसकट पाणीकपात केली जाणार आहे. जलअभियंता विभागाने अभ्यास करून कपात करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यावर अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी शेरा मारला असून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव आयुक्तांकडे गेला आहे. त्यामुळे आयुक्तांच्या मंजुरीनंतर येत्या बुधवारी स्थायी समितीपुढे पाणीकपातीचा प्रस्ताव मंजुरीला येत आहे. यामध्ये कपातीवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे महापालिकेला जे पाणी पुरवण्यात येते, त्यातही कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे येत्या बुधवारी २० टक्के पाणीकपातीचा निर्णय झाल्यास गुरुवारपासून मुंबईकरांना होणारा पाण्याचा पुरवठा आता कमी होणार असून या कपातीमुळे शेवटच्या टोकाला असलेल्या वस्त्या आणि डोंगराळ वस्त्यांमध्ये पाण्याची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

Previous Post

महापालिका प्रभाग समिती रचना ठरावाला थेट मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती

Next Post

इसिससाठी भरती करणार्‍या १४ जणांना स्पेनमध्ये अटक

Next Post
इसिससाठी भरती करणार्‍या १४ जणांना स्पेनमध्ये अटक

इसिससाठी भरती करणार्‍या १४ जणांना स्पेनमध्ये अटक

आगरी-कोळी भवनाचा फायदा स्थानिकांनाच झाला पाहिजे – नामदेव भगत

आगरी-कोळी भवनाचा फायदा स्थानिकांनाच झाला पाहिजे - नामदेव भगत

कांदा पुन्हा कडाडला, लासलगावला ४३ रूपये किलो

लासलगावमध्ये कांद्याच्या दरात घसरण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com