• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 20, 2015

‘अजिंक्यतारा’ कोसळला !

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
‘अजिंक्यतारा’ कोसळला !

८० मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले!

मुंबई : मॉरिशअस इथं होणारा मराठमोळा ‘अजिंक्यतारा’ पुरस्कार सोहळा आज सकाळी अचानक रद्द करण्यात आलाय. यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्व तयारीनिशी निघालेल्या तब्बल ८० मराठी कलाकारांना विमानतळावरून माघारी परतावं लागलंय.
मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला-वहिला ‘अजिंक्यतारा’ हा पुरस्कार कार्यक्रम २१ ते २३ ऑगस्टला मॉरिशसच्या स्वामी विवेकानंद कन्व्हेशन सेंटर या भव्य सभागृहात पार पडणार होता. सुपरविस्टा एन्टरटेनमेंटने या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या सोहळ्याच्या निमित्तानं अनेक परफॉर्मन्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी मोठ्या जल्लोषात सुरू होती. मानसी नाईक, अमृता खानविलकर, पूजा सावंत, अभिजीत केळकर, नेहा पेंडसे यासारखे अनेक आघाडीचे कलाकार कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार होते. परफॉर्मन्सची तयारी झाली. तालमी झाल्या. बॅगा भरल्या गेल्या आणि सगळे विमानतळावरही दाखल झाले.
आज सकाळी ७.४५ च्या फ्लाईटनं जवळपास ८० कलाकारांची टीम मॉरिशिअसला प्रस्थान करणार होती. रात्री अडीच-तीन वाजल्याच्या सुमारास सगळे कलाकार विमानतळावर दाखलही झाले. चेकींग वगैरे सोपस्कारही पार पडले आणि अचानक चारच्या सुमारास सगळ्यांच्या मोबाईलवर पुरस्कार सोहळा रद्द झाल्याचे मॅसेज धडकले. त्यामुळे, या सर्व कलाकारांना एकच धक्का बसला. कार्यक्रम का रद्द करण्यात येतोय याचं कारण मात्र कलाकारांना देण्यात आलं नाही.
आयोजकांनी अशा पद्धतीनं आपला अपमान केल्याची भावनाच मराठी कलाकारांनी बोलून दाखवलीय. आपली मेहनत वाया गेल्याचं दु:ख वेगळंच. कलाकारांना गृहित धरण्याच्या या मानसिकतेबद्दल अभिनेता अभिजीत केळकर यानं नाराजी व्यक्त केलीय.
आयोजकांपैकी मुख्य असलेल्या ‘सिनेयुग’ कंपनीनं अचानक माघार घेतल्यानं हा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात येतंय. या पुरस्कर सोहळ्यासाठी ‘सिनेयुग ग्रुप ऑफ कंपनी’ इव्हेंट मॅनेजमेंट पार्टनर होती तर ‘किड्झेनिया’ मुंबई वेन्यू पार्टनर म्हणून काम पाहणार होते.

Previous Post

जागतिक क्रमवारीत सायना पुन्हा एकदा अव्वल

Next Post

रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोनला पेमेंट बँकेची आरबीआयची मान्यता

Next Post
रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोनला पेमेंट बँकेची आरबीआयची मान्यता

रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोनला पेमेंट बँकेची आरबीआयची मान्यता

जितेंद्र आव्हाडांच्या ‘संघर्ष’ची दहीहंडी रद्द

जितेंद्र आव्हाडांच्या ‘संघर्ष’ची दहीहंडी रद्द

स्थलांतरीत कुकशेत गावाचा मालमत्ता कर गावठाणातील घराप्रमाणे आकारणार व्याज दंड व्याज विलंबशुल्क माफ!

स्थलांतरीत कुकशेत गावाचा मालमत्ता कर गावठाणातील घराप्रमाणे आकारणार व्याज दंड व्याज विलंबशुल्क माफ!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com