• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 29, 2015

कांदा महागला, ५० रूपये किलो !

adminbyadmin
in नवी मुंबई
0

नवी मुंबई : मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाल्यामुळे राज्यभर कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. नवीन पिकांची अद्याप लागवड झाली नसून ते पीक मार्केटमध्ये येईपर्यंत तेजी कायम राहणार आहे. मुंबईतील किरकोळ मार्केटमध्ये कांदा ५० रुपये किलो दराने विकला जात असून दिवाळीपर्यंत बाजारभाव वाढतच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गतवर्षी झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांद्याचे उत्पन्न कमी झाले होते. कांद्याचा दर्जाही हलका असल्यामुळे तो जास्त दिवस साठवता आला नाही. शेतकर्‍यांनी उन्हाळ्यामध्येच बराचसा कांदा विकला. प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये कांद्याचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण होतो. परंतु या वर्षी जुलै अखेरीसच प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक खूपच कमी असल्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ६४ ट्रक व ३९ टेम्पोंमधून कांदा विक्रीला आला आहे. होलसेल मार्केटमध्ये कांदा २६ ते ३६ रुपये किलोने विकला गेला. चांगल्या दर्जाचा कांदा ४० रुपये किलो
दरानेही विकला गेला. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. जुलैमधील हा विक्रमी दर असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळी कांद्याचा साठा कमी असून पोळ कांद्याची लागवड अद्याप पूर्ण झालेली नाही.
राज्यात कांद्याचे दर वाढू लागले आहेत. मुंबईत किरकोळ मार्केटमध्ये एक किलोसाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत. पुढील जवळपास तीन महिने भाव वाढत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाव कमी करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. जास्तीत जास्त कांदा विक्रीसाठी उपलब्ध करावा, अशी मागणी होत आहे.

Previous Post

महापालिका प्रशासनाने बसविली धोकादायक इमारतीत लाखोंची लिफ्ट

Next Post

विदर्भ आयकॉन्स २०१५ व उद्योगश्री पुरस्कार सन्मान सोहळा उत्साहात

Next Post
विदर्भ आयकॉन्स २०१५ व उद्योगश्री पुरस्कार सन्मान सोहळा उत्साहात

विदर्भ आयकॉन्स २०१५ व उद्योगश्री पुरस्कार सन्मान सोहळा उत्साहात

सोनं २० हजारांवर दाखल होणार?

भारतात शंभर व्यक्तीमागे साठ व्यक्ती कानांच्या आजाराने त्रस्त

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com