• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 27, 2015

प्रभाग ८५-८६ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग ८५-८६ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

निलम पाटोळे
नवी मुंबई : नेरूळ पश्‍चिमेला असणार्‍या प्रभाग ८५-८६मध्ये शनिवारी (दि.२७) सांयकाळी दहावी-बारावीमध्ये नेत्रदीपक यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा घरोघरी जावून सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्थानिक नगरसेविका सौ. सुजाता पाटील, जयश्री ठाकूर व माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
दोन दिवसापूर्वी प्रभाग ८५ मध्ये समाविष्ठ होणार्‍या कुकशेत गावात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने दहावी-बारावी परिक्षेत नेत्रदीपक यश मिळविणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याच अभियानाचा एक भाग म्हणून प्रभाग ८५-८६मधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहती, साडेबारा टक्के भुखंडावरील ईमारती व सारसोळे गावातील विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष यशवंत तांडेल, अशोक आतकरी, महादेव पवार, स्वप्निल म्हात्रे यांच्यासह स्थानिक भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्थानिक नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या यशामध्ये विद्यार्थ्यांच्या परिश्रमासह शिक्षकांचा व पालकांचाही तितकाच वाटा असतो. दहावीत मिळालेल्या यशाने विद्यार्थ्यांने हूरळून न जाता यापुढील शैक्षणिक वाटचालीत यशामध्ये सातत्य ठेवावे. आपल्या शैक्षणिक प्रगतीवर घरचा विकास अवलंबून आहे याचे विद्यार्थ्यांने सदोदीत भान ठेवावे.
घरोघरी झालेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामुळे पालकांनी नगरसेविका सौ. सुजाता पाटील व नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर यांची प्रशंसा केली. निवडणूकानंतरच्या दोन महिन्याच्या कालावधीत नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांनी नेरूळ सेक्टर सहा परिसरात दैनंदिन जनसंपर्क ठेवून नागरी समस्या निवारणात पुढाकार घेतला आहे.

Previous Post

शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण कार्यशाळा

Next Post

माहितीच्या अधिकाराचे अवघ्या दोन दिवसांत उत्तर

Next Post
माहितीच्या अधिकाराचे अवघ्या दोन दिवसांत उत्तर

माहितीच्या अधिकाराचे अवघ्या दोन दिवसांत उत्तर

उघड्यावर लघुशंका करणार्‍या १०९ जणांना अटक

उघड्यावर लघुशंका करणार्‍या १०९ जणांना अटक

आरोग्यविषयक कामांना सर्वप्रथम निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

कंत्राटी कामगार कायम सेवा, माथाडी उद्यान, अपघातमुक्त पामबीचकरता शिवसेनेचा पाठपुरावा कायम!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com