• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 29, 2014

‘घनकचरा उचलण्याप्रकरणी शिवसेनेचा मोर्चा म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण’

adminbyadmin
in नवी मुंबई
0

* नगरसेविका माधुरी सुतार यांचा घणाघात

नवी मुंबई : शहरातील घनकचरा उचलण्याच्या विषयी शिवसेनेने शनिवारी महापालिका मुख्यालयावर काढलेला मोर्चा म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असून त्यांना हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे असा घणाघाती पलटवार राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या नगरसेविका माधुरी सुतार यांनी केला आहे.
वास्तविक कचरा उचलण्याच्या कामाचा प्रस्ताव महापालिकेच्या येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार असल्याने आपली पोलखोल होईल या भितीने आणि आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी सेनेच्या नेत्यांनी मोर्चाचा स्टंट केला आहे. महापौर सागर नाईक यांनी देखील या प्रश्‍नाविषयी तोडगा काढण्यासाठी बैठका घेतल्या होत्या. शहरातील घनकचरा उचलून डंपिंग ग्राउंडपर्यंत पोहोचविण्यासाठी एक उपयुक्त प्रस्ताव महासभेत यापूर्वी मांडण्यात आला होता मात्र या कामावरील खर्च जादा असल्याचा कांगावा करुन या प्रस्तावाला कॉंगे्रससह इतर विरोधी पक्षांनी विरोध केला होता. कॉंगे्रसने या प्र्रस्तावाविरोधात राज्याच्या नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे या प्रस्तावाला राज्य सरकारकडून स्थिगिती देण्यात आली होती. या संदर्भात शासनाने मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची एक चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने दिलेल्या चौकशी अहवालात कचरा उचलण्याच्या प्रस्तावामध्ये कोणताही नियमबाहय जादा निधी देण्यात आला नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे विरोधकांच्या मुस्काटात मारल्यासारखे झाले होते. कॉंगे्रस आणि शिवसेनेच्या उपद्रवी भुमिकेमुळे घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करता आली नव्हती त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता, असे नगरसेविका माधुरी सुतार म्हणाल्या. घनकचरा व्यवस्थापनाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिकेच्या पुढच्या स्थायी समिती सभेत येतो आहे आणि म्हणूनच फुकटचे श्रेय उपटण्यासाठी या प्रश्‍नी सेनेने मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा स्टंट केल्याची टीका त्यांनी केली. मात्र शहरात कचर्‍याचा त्रास कुणामुळे झाला हे नवी मुंबईकर चांगलेच जाणून आहेत, असा टोलाही सुतार यांनी लगावला आहे. शिवसेनेला जर मोर्चा काढायचाच असेल तर या प्रस्तावाविरोधात सरकारकडे नाहक तक्रार करणारे कॉंगे्रसचे नगरसेवक दशरथ भगत यांच्या घरावर काढावा, असेही नगरसेविका सुतार यांनी सेनेच्या नेत्यांना सुनावले आहे.

Previous Post

गावठाणातील घरांचे काय?

Next Post

आमदार मंदाताई म्हात्रेंचा बेलापुरात नागरी सत्कार

Next Post
गावठाणातील घरांचे काय?

आमदार मंदाताई म्हात्रेंचा बेलापुरात नागरी सत्कार

कांदा १० रूपये तर बटाटा २० रूपये किलो

गुन्हे / घात /अपघात मुक्काम पोष्ट नवी मुंबई पोलीस आयुक्तालय

गुन्हे / घात /अपघात मुक्काम पोष्ट नवी मुंबई पोलीस आयुक्तालय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com