• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 8, 2014

जनतेची घोेर निराशा करणारा रेल्ेल्वे अर्थसंकल्प

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जनतेची घोेर निराशा करणारा रेल्ेल्वे अर्थसंकल्प

माजी खासदार संजीव गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- नरेंद्र मोदी सरकारचा रेल्वे अर्थसंकल्प हा जनतेची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प आहे. जनतेच्या खिशातून पैसे काढून स्वतःची खळगी भरणारा सरकारचा हा अर्थसंकल्प असल्याची टीका ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार संजीव नाईक यांनी या बजेटवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना केली आहे.
अच्छे दिन आनेवाले है, असे सांगत बुरे दिन या सरकारने आणले असून जनतेचा विश्‍वासघात केल्याचे ते म्हणाले. रेल्वेच्या इतिहासात आत्तापर्यंत १४.२ टक्के भाडेवाढ कोणत्याही सरकारने केली नव्हती ती मोदी सरकारने केली आहे. थेट परदेशी गुंतवणूक आणण्याचे सुतोवाच करुन खाजगीकरणाच्या माध्यमातून मोदी सरकारने देश विकण्यास काढला आहे, असा घणाघात डॉ.नाईक यांनी केला आहे. खाजगीकरणामुळे रेल्वेच्या सुविधा घेण्यासाठी आता प्रवाशांना पैसे मोजावे लागणार आहेत. ठाणे आणि नवी मुंबईसाठी या अर्थसंकल्पात काहीच ठोस नाही. खैरणे-बोनकोडे आणि दिघा ही दोन नवीन रेल्वे स्थानके नवी मुंबईसाठी मंजूर करुन घेतली होती. या दोन रेल्वे स्थानकांचा या बजेटमध्ये उल्लेख नाही. उरण-पनवेल आणि सीवूड- पनवेल या रेल्वे मार्गांचा उल्लेख नाही. नवी मुंबईतील वाशी खाडीपुलावरील सरचार्ज कमी करण्याचा उल्लेख नाही. १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या करण्याविषयी तरतूद नाही. डिझेलवरील अधिभार कायम आहे.
मुंबईसाठी एसी ट्रेन चाचणी करुन तयार आहेत. त्याला गती देण्यात आलेली नाही. एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे ‘खोदा पहाड, निकला चूहा’ असा आहे. जनतेने मोदी सरकारला भरभरुन मतदान केले. त्याची परतफेड या सरकारने जनतेवर महागाई लादून केल्याचा टोला संजीव नाईक यांनी लगावला आहे.
मुंबई आणि उपनगराच्या तोंडाला या अर्थसंकल्पाने पाने पुसली आहेत. याकडेे लक्ष वेधण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिष्टमंडळ घेणार असल्याची माहिती संजीव नाईक यांनी दिली.

Previous Post

नालेसफाईच्या नावाखाली महापालिकेचा लाखोंचा डल्ला

Next Post

राज्यात मराठा, मुस्लीम आरक्षण लागू

Next Post
राज्यात मराठा, मुस्लीम आरक्षण लागू

राज्यात मराठा, मुस्लीम आरक्षण लागू

शिवसेनेच्या मेळाव्यासाठी दहा हजार बेरोजगारांची नावनोंदणी

नेरूळला युवा सैनिकांची नावनोंदणी दणक्यात!

नेरूळला युवा सैनिकांची नावनोंदणी दणक्यात!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com