• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, May 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 14, 2025

घणसोली डेपोतील सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत घेण्याची महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिका परिवहन उपक्रमाच्या घणसोली डेपोत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची सेवा अन्यायकारकरित्या खंडित करण्यात आल्याने त्यांना तातडीने सेवेत घेण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका परिवहन व्यवस्थापकांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

महापालिका परिवहन विभागाच्या घणसोली डेपोत महालक्ष्मी या कंपनीत काही कामगार सफाईचे काम करत होते. त्यांना महालक्ष्मी कंपनीच्या व्यवस्थापणाने कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणतीही नोटीस न देता अचानक त्यांना काम बंद करण्यास सांगितले आहे. महापालिका प्रशासनाने या कंपनीला टर्मिनेट केले आहे. या कामगारांना गेल्या महिन्याचा पगारही आजतागायत भेटलेला नाही. असे असताना कंपनीने त्यांची सेवा अचानक खंडीत केली असून त्यांना कामावर न येण्यास बजावले आहे. सध्या डेपोत सर्वत्र घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. या सफाई कामगारांनी गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे प्रशासनात सेवा केलेली आहे. पालिकेत काम करणारे कर्मचारी हे पालिकेचे आहेत. ठेकेदार, कंत्राटदार बदलला तरी या कामगारांची सेवा कायम असते. त्यांना कोणीही नोकरीवरुन काढत नाही. महापालिकेचे तसे धोरण आहे. अवघ्या  १२ हजार रुपयांवर हे कर्मचारी या महागाईच्या काळात काम करत आहेत. या कामगारांचा पीएफही कापला जात नाही. ठेकेदारांकडून आजवर या कामगारांचे शोषण केले आहे. कामगारांना सेवामुक्त केल्याच्या कृत्याचा महापालिका प्रशासनाने कंपनीला जाब विचारावा. नियमाप्रमाणे  कामगारांना पगार स्लिप, पगार, पीएफ, मेडिक्लेम हे दिलाच पाहिजे. आजवर कामगारांचे शोषणच केले असल्याने त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी आपण संबंधित कंपनीला व प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.

Previous Post

श्वान पाळण्यासाठी महापालिकेचा परवाना बंधनकारक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com