• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 1, 2024

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

 महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या सत्ताकारणाची दिशा ठरवणार

सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचा विजय होणार असून महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.

वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रामध्ये अमित शहा यांनी कोकण विभागीय कार्यकर्ता संवाद बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना प्रत्येक कार्यकर्त्याने नियोजनपूर्वक  काम करून विजय साकार करावा, असे आवाहन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री आश्विन वैष्णव, भूपेंद्र सिंग, माजी केंद्रीय मंत्री व कोकणचे खासदार नारायण राणे, विनोद तावडे, लोकनेते आमदार गणेश नाईक, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, माधवीताई नाईक,  मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार धैर्यशील पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.  नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी अमित शहा यांचे स्वागत केले.

 काँग्रेसने आतापर्यंत तृष्टीकरणाचेच राजकारण केले, असा आरोप करत केंद्रातील भाजपाप्रणित सरकारने ६० करोड जनतेला अन्न, निवारा वैद्यकीय उपचार निशुल्क उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला देशातील जनतेने सलग तीन वेळा पसंती दिली आहे. देशातील अर्ध्या डझनपेक्षा जास्त राज्यांमध्ये सलग तीन वेळा भाजपाचे सरकार आले आहे. भाजपा सरकारचा अजेंडा हा भारताचा अजेंडा असल्याचे शहा यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  काँग्रेसने पसरविलेला फेक नरेटीव संपवण्यात भाजपाला बऱ्यापैकी यश आल्याचे म्हटले. राज्यातील परिवर्तनवादी महायुती सरकारने लोककल्याणाच्या आणि राज्याच्या विकासाची अनेक कामे केली असून  झालेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीचे सरकार फक्त स्थगिती सरकार होते. एक तरी ठळक विकासकाम केल्याचे त्यांनी दाखवून द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी निवडणूक जाहीर झाली आहे असे समजून आतापासूनच एक दिलाने महायुतीच्या घटक पक्षांबरोबर संवाद, समन्वय ठेवून  कामाला लागण्याचे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी  पक्षाच्या  संघटनात्मक कामाचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत पाटील यांनी केले.

Previous Post

भविष्यातील लोकसंख्येस आवश्यक पाणी पुरवठयासाठी महापालिकेचे गतीमान नियोजन

Next Post

सर्वपक्षीय शेकडो  कार्यकर्त्यांचा उपनेते विजय नाहटा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर  प्रवेश

Next Post
सर्वपक्षीय शेकडो  कार्यकर्त्यांचा उपनेते विजय नाहटा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर  प्रवेश

सर्वपक्षीय शेकडो  कार्यकर्त्यांचा उपनेते विजय नाहटा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर  प्रवेश

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या ‘विकास कामांच्या कार्य अहवालाचे’ लोकार्पण

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या ‘विकास कामांच्या कार्य अहवालाचे’ लोकार्पण

बेलापूरमधील द पार्क हॉटेलवर मनसेची धडक

बेलापूरमधील द पार्क हॉटेलवर मनसेची धडक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com