• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 22, 2024

मुंबई-गोवा महामार्गावरील कामाबाबत राज्य सरकारने जनतेला जाहीरपणे माहिती देण्याची एमआयएमची मागणी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

नवी मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील कामाबाबत राज्य सरकारने जनतेला जाहीरपणे माहिती देण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण हा गेली अनेक वर्षे प्रलंबित विषय आहे. सरकार या मार्गाच्या कामास गेली अनेक वर्षे विलंब करुन कोकणवासियांच्या संयम व सहनशीलतेची परिक्षा पाहत आहे. वर्ष २०११ ला पूर्ण होणारा प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. आता मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी नवीन डेडलाईन सरकारने न्यायालयात दिली आहे. आता, ३१ डिसेंबर २०२४ ही नवीन डेडलाईन सरकारने ठरवली आहे. हा पावसाळा सुरु आहे. अवघे सहा महिने आता उरले आहेत. काम बरेच बाकी आहे. त्यामुळे या मुदतीतही काम पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. सर्वांचीच सरकारे आली आणि गेली, पण हे काम ना पूर्ण झाले. ना कामास गती मिळाली.  प्रकल्पाला होत असलेल्या विलंबामुळे उच्च न्यायालयाने वारंवार नाराजी व्यक्त करुनही राज्य सरकारकडून आजतागायत कामाला पाहिजे तशी गती देण्यात आलेली नाही. तसेच प्रकल्प लांबणीवर पडल्याने खर्चातही वाढ होत असून जनतेच्या पैशाचा हा अपव्यय आहे. दरवर्षी कोकणवासियांना गावी जाण्यायेण्यासाठी गणेशोत्सवाला व उन्हाळी-दिवाळी सुट्टीमध्ये खड्ड्यांतूनच ये-जा करावी लागत आहे. दहा वर्षामध्ये या मार्गावर दोन हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झालेला असल्याची कबुली राज्य सरकारनेच विधीमंडळात दिलेली आहे. मुंबई-गोवा चौपदरीकरणास होत असलेल्या विलंबाचा त्रास कोकणवासियांनाच अधिक सहन करावा लागत आहे.  त्यामुळे राज्य सरकारने आता कोकणवासियांच्या संयमाचा अंत पाहू नये. याप्रकरणी कामाची सध्या स्थिती काय आहे? किती दिवसात पूर्ण होईल? इतकी वर्षे या कामास विलंब का झाला? याबाबत राज्य सरकारने कोकणच्या जनतेला जाहीरपणे स्पष्टीकरण देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

Previous Post

जुईनगर नोडसह नेरूळ परिसरात आरोग्य विभागाचे मार्गदर्शन शिबीर तातडीने आयोजित करा

Next Post

नवी मुंबई विमानतळाच्या आवारात अंतुलेंसह दि बा पाटील यांचे स्मारक उभारण्याची एमआयएमची मागणी

Next Post
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

नवी मुंबई विमानतळाच्या आवारात अंतुलेंसह दि बा पाटील यांचे स्मारक उभारण्याची एमआयएमची मागणी

रेल्वे जागेवरील झोपडपट्ट्याच्या पुनर्वसनसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार : उदय सामंत   

रेल्वे जागेवरील झोपडपट्ट्याच्या पुनर्वसनसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार : उदय सामंत  

नेरूळ सेक्टर सहाच्या मैदानातील झाडांच्या फांद्याचा कचऱ्याचा ढिगारा हटवा

नेरूळ सेक्टर सहाच्या मैदानातील झाडांच्या फांद्याचा कचऱ्याचा ढिगारा हटवा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com