• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 10, 2024

कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा निर्णय घ्या : हाजी शाहनवाझ खान

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

एमआयएमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा लवकर निर्णय घेण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईतील तुर्भे येथे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या बाजार समितीमध्ये कांदा बटाटा, फळ , भाजी, किराणा दुकान, धान्य अशी पाच मार्केट आहे. या पाच मार्केटमध्ये कांदा बटाटा मार्केटची गेल्या दोन –अडीच दशकापासून धोकादायक अवस्था आहे. सिडकोने या मार्केटचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे केल्याने मार्केट सुरू होताच काही वर्षांमध्येच स्लॅप कोसळणे, लोखंडी सळ्या बाहेर येणे, तडे जाणे, वाळू गळणे अशा प्रकाराचा सामना मार्केटमधील बाजार समितीचे कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, माथाडी, मापाडी, पालावाल, मेहता, खरेदीदार, शेतकरी यांना करावा लागला आहे. अडीच दशके मार्केट धोकादायक अवस्थेत असतानाही राज्य सरकार मार्केट पुनर्बांधणीबाबत काहीही करत नाही, ही शोकांतिका व संतापजनक बाब असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
या मार्केटमधील घटकांना आज जीव मुठीत ठेवून वावरावे लागत आहे. नवी मुंबई महापालिकेनेही मार्केट धोकादायक करून आज २० वर्षांचा कालावधी लोटला तरी मार्केटमध्ये व्यवहार होत आहेत. गाळ्यांची अवस्था धोकादायक आहे. अनेकदा दुर्घटनाही घडल्या आहेत. मोठी दुर्घटना झाल्यावर सरकार पुनर्बांधणीबाबत निर्णय घेणार आहे का? मार्केटमध्ये पडझड झाल्यास बाजार समितीचे कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, माथाडी, मापाडी, पालावाल, मेहता, खरेदीदार, शेतकरी यांच्या जिविताला धोका निर्माण होवू शकतो. समस्येचे गांभीर्य पाहता, ही दुर्घटना टाळण्यासाठी आपण संबंधितांना या मार्केटच्या पुनर्बांधणीबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.

Previous Post

उद्यान व क्रिडांगणातील समस्या सोडवून बकालपणा घालवा : संदीप खांडगेपाटील

Next Post

विनाभूसंपादन शेतातील अतिक्रमण हटवून मयत शेतकऱ्याला न्याय द्या : हाजी शाहनवाझ खान

Next Post
पिंपळगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करा : संदीप खांडगेपाटील

विनाभूसंपादन शेतातील अतिक्रमण हटवून मयत शेतकऱ्याला न्याय द्या : हाजी शाहनवाझ खान

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

‘स्वच्छ सर्वेक्षणात मिळालेल्या यशाचे खरे श्रेय पालिका आयुक्त, अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच : रविंद्र सावंत

नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

न्हावा शेवा सी लिंक अटल सेतूवरील टोल माफक ठेवण्याची एमआयएमची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com