• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 28, 2023

कमी दाबाने तसेच दूषित पुरवठा होत असलेल्या पाण्याचे देयक आकारु नका : हाजी शाहनवाझ खान

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

नवी मुंबई : कमी दाबाने तसेच दूषित पुरवठा होत असलेल्या पाण्याचे देयक न आकारण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव व रायगड-नवी मुंबईचे प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नेरूळ, सानपाडा व जुईनगरचे रहीवाशी गेल्या काही महिन्यापासून पाण्याच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. स्वमालकीचे मोरबे धरण असतानाही येथील रहीवाशांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेरूळ व जुईनगरच्या रहीवाशांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे रहीवाशांना जुलाब होणे, उलट्या होणे, ताप येणे अशा आजारांचा सामना करावा लागत असून घरामध्ये दोन ते तीन जण आजारी आहेत. दूषित पाण्यामुळे जिवितास धोकाही निर्माण झालेला असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनातून महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

नागरिकांना एकतर मोरबे धरण असतानाही कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे दूषित पाण्यामुळे आजारावरील उपचारासाठी पैसा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे जोपर्यत महापालिका प्रशासनाला माफक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देता येत नाही व दूषित नाही तर स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे जमत नाही, तोपर्यत पाण्याचे बिल रहीवाशांना आकारू नये. दूषित पाण्याचे महापालिका का बिल आकारात आहे? बिल नका आकारू. रहीवाशांना उपचारासाठी खर्च झालेले पैसे महापालिकेने देणे आवश्यक आहे. त्यामुळे कमी दाबाने तसेच दूषित पुरवठा होत असलेल्या पाण्याचे देयक आकारू नये अशी मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

नामदेव भगत यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती

Next Post

जिल्हाध्यक्ष संदीप नाईक  यांच्या जनता दरबारात समस्यांचे निवारण

Next Post
जिल्हाध्यक्ष संदीप नाईक  यांच्या जनता दरबारात समस्यांचे निवारण

जिल्हाध्यक्ष संदीप नाईक  यांच्या जनता दरबारात समस्यांचे निवारण

जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

 शनिवारचा नेरूळ-जुईनगरचा  पाणीपुरवठा सुरळीत ठेवा : विद्या भांडेकर

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तुलसी भवन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी  ५ लाख रूपयांची मदत

ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सभागृहाचे सोमवारी होणार उद्घाटन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com