• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 31, 2023

मराठा आरक्षणाबाबत संसदेत विशेष अधिवेशन बोलवावे :  खासदार राजन विचारे

adminbyadmin
in ठाणे
0
मराठा आरक्षणाबाबत संसदेत विशेष अधिवेशन बोलवावे :  खासदार राजन विचारे

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे मराठा समाजाला सरकारी पातळीवर आरक्षण देण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याने महाराष्ट्रात सध्या तणावाची परिस्थिती लक्षात घेता शिवसेना नेते तथा ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे मराठा, धनगर, आदिवासी तसेच इतर जातीच्या आरक्षणाबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यासंदर्भाचे पत्र पाठविले आहे.

या पत्रामध्ये खासदार राजन विचारे यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात मराठा समाजाचे मोठे योगदान ऐतिहासिक काळापासून आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मराठा होते त्यांनी संपूर्ण समाजातील अठरा पगड जाती व १२ बलुतेदारांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य, महाराष्ट्र निर्माण केला. आज या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही आज या समाजाला न्यायाची गरज आहे, असे पत्रामध्ये म्हंटले आहे.

तसेच आपण सन २०१४ मध्ये देशात सत्तेवर आल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालवण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आरक्षणाबाबत येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्तापर्यंत महाराष्ट्रात ५७ हून अधिक मोर्चे व आंदोलने झाली आहेत. अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्तापर्यंत ८ युवकांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी गेल्या दोन महिन्यांमध्ये चार आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण गणपतीच्या दिवसात महिला आरक्षणाबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले होते त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सद्यस्थितीत असलेले तणावाचे वातावरण लक्षात घेऊन मराठा, धनगर, आदिवासी व इतर जातीच्या आरक्षणा संदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा गांभीर्याने विचार करून संविधानानुसार आरक्षणाच्या मुद्द्याला कायदेशीर दर्जा देण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

Previous Post

तरुण-तरुणींनी स्वयंरोजगाराकडे वळावे : आ. मंदाताई म्हात्रे

Next Post

महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ३० हजार सानुग्रह अनुदान जाहीर

Next Post
महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ३० हजार सानुग्रह अनुदान जाहीर

महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ३० हजार सानुग्रह अनुदान जाहीर

विशेष मिशन इंद्रधनुष्य’ लसीकरणाच्या तिन्ही फेऱ्या यशस्वी

विशेष मिशन इंद्रधनुष्य’ लसीकरणाच्या तिन्ही फेऱ्या यशस्वी

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तुलसी भवन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी  ५ लाख रूपयांची मदत

शनिवारी बेलापुरमध्ये आदिवासी भवनचे उद्घाटन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com