• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 30, 2023

संभाजी भिंडेंना तडीपार करण्यासाठी नेरूळ कॉंग्रेसची निदर्शने

adminbyadmin
in नवी मुंबई
0
संभाजी भिंडेंना तडीपार करण्यासाठी नेरूळ कॉंग्रेसची निदर्शने

Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६

नवी मुंबई : महात्मा गांधीबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेना अटक करून त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करावे यासाठी नेरूळ पोलिस स्टेशनसमोर नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसतर्फे कामगार नेते व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व त्यानंतर नेरुळ पोलिस ठाण्यात जावून संभाजी भिडेंना महाराष्ट्रातून तडीपार करावे या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सादर केलेल्या निवेदनात रविंद्र सावंत म्हणाले की, संभाजी भिडे यांनी २४ जुलै रोजी अमरावतीत एका जाहिर कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी लज्जास्पद व अपमानजनक वक्तव्य केले आहे. ‘साबरमती के संत तुने कर दिया कमाल, मिली हमे आझादी बिना खडंग बिना ढाल’ ही गाणी बोलत तसेच कानावर पडत आमची पिढी तसेच आमच्या मागची पिढी लहानाची मोठी झाली व आताच्या पिढीलाही ही गाणी परिचित आहेत. यातूनच गांधीजींची राष्ट्रभक्ती व स्वातंत्र्य चळवळीतील योगदान स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी अपमानकारक वक्तव्य करून १४४ तासांचा (सहा दिवस) कालावधी लोटला तरी संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल झालेला नाही व त्यांना अद्यापि अटकही करण्यात आलेली नाही. भिडेंवर कारवाई नाही, अटक नाही याचाच अर्थ भिडेंच्या वक्तव्याचे पोलिसांकडून समर्थंन तर केले जात नाही ना? भिडेंच्या वक्तव्यामुळे जनसामान्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. भिंडेच्या राष्ट्रपित्याबद्दलच्या वक्तव्याकडे आज कानाडोळा झाल्यास उद्या कोणीही उठेल राष्ट्रपुरूषाबद्दल अपमानास्पद वक्तव्य करण्याचे धाडस दाखवेल. भिडेंना शासन होणे आवश्यक आहे. गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. यामुळे जनसामान्यांमध्ये प्रक्षोभाचे वातावरण असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीविषयी अपमानास्पद वक्तव्य निर्माण करून समाजजीवनात वाद निर्माण करण्याचा तसेच समाजजीवनात दुही निर्माण करण्याची भिडे यांची नियोजित खेळी आहे. षडयंत्र आहे. या अपप्रवृत्तींना वेळीच ठेचून काढणे आवश्यक आहे. आपण भिडेंना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. भिडे हे गेल्या काही वर्षांत सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करून समाजजीवनातील सामाजिक शांततेत कलह निर्माण करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करत आहेत.  यामुळे जनसामान्यात वाद निर्माण होण्यास खतपाणी घातले जात आहे. समाजातील जातीधर्मात फूट पाडण्याचा व वाद निर्माण करण्याचा जाणिवपूर्वक भिडे सातत्याने प्रयत्न करत असतात. हा शाहू-फुले-आंबेडकरांचा, शिवछत्रपतींचा , तुकाराम महाराज, ज्ञानोबा माऊलींचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात असल्या अपप्रवृत्तींना आता थाराच नको. सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या भिडेंना अटक करून त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करावे, अशी मागणी रविंद्र सावंत यांनी निवेदनातून केली.

नेरूळ पोलिस स्टेशनसमोर नेरूळ कॉंग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या अटक करा, अटक करा, संभाजी भिंडेना करा, समाजात कलह निर्माण करणाऱ्या संभाजी भिंडेना महाराष्ट्रातून तडीपार करा,  अशा जोरदार घोषणा यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केल्या.

नेरुळ पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना निवेदन देताना नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी संभाजी भिडे यांच्यामुळे महाराष्ट्रातील जनसामान्यांत कलह निर्माण झाला आहे. संभाजी भिडे वारंवार बेताल वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असून ही सर्व भाजपची खेळी आहे. संभाजी भिडेसारख्या अपप्रवृत्ती महाराष्ट्रातून तडीपार करणे आवश्यक असल्याने त्यांना अटक करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या ताई भांडेकर,  कॉंग्रसेच्या माजी नगरसेविका मिरा पाटील, कॉंग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष सुतार, कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष  एस. कुमार, सारसोळे व नेरूळ सेक्टर सहाचे कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे, जुईनगर कॉंग्रेसचे विभाग अध्यक्ष महानंद रामराजे, सचिव  विजय कुरकुठे, सचिव  विनायक तळेकर,  नेरूळ ब्लॉक काँग्रेस, उपाध्यक्ष दिनेश गवळी, प्रल्हाद गायकवाड , सुधीर पांचाळ, नाका कामगार इंटक नेरूळचे अध्यक्ष दिनेश गव्हाणे उपस्थित होते.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानातील मार्गिकेवरील पायवाटेवर शेवाळाचे साम्राज्य

Next Post

नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गाव वृक्षछाटणी अभियान राबविण्याची कॉंग्रेसची मागणी

Next Post
नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गाव वृक्षछाटणी अभियान राबविण्याची कॉंग्रेसची मागणी

नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गाव वृक्षछाटणी अभियान राबविण्याची कॉंग्रेसची मागणी

जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

नेरूळ सेक्टर २, ४ तसेच जुईनगर नोडमधील रस्त्यावरील खड्डे बुजवा : विद्या भांडेकर

इरर्शाळवाडीच्या ग्रामस्थांना नवी मुंबई भाजपच्या महिला रणरागिंनीची भेट

इरर्शाळवाडीच्या ग्रामस्थांना नवी मुंबई भाजपच्या महिला रणरागिंनीची भेट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com