• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 25, 2023

राहुल गांधींच्या बॅनरला जोडे मारणाऱ्यांवर कडक कारवाई करा : बाळासाहेब थोरात.

adminbyadmin
in मुंबई
0
राहुल गांधींच्या बॅनरला जोडे मारणाऱ्यांवर कडक कारवाई करा : बाळासाहेब थोरात.

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

 मुंबई : विधानभवन परिसरात राहुल गांधी यांच्या बॅनरवरील फोटोला चपला, जोड्यांनी मारहाण करण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला. अशा प्रकराचे विकृत प्रकार होणे पुर्णपणे चुकीचे, निंदनीय व लोकशाहीस मारक आहे. अशा प्रकारचे गैरवर्तन आपल्या कार्यकाळात झाले असून विधानसभा अध्यक्षांसाठीही हे योग्य नाही. या घटनेबाबत दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

यासंदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेच्या परिसरात राहुल गांधींच्या बॅनरबाबत जी विकृत घटना घडली ती विधानसभेच्या इतिहासातील एक निंदनीय व दुर्दैवी घटना आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचेबाबत हा प्रकार घडला आहे मात्र हे लक्षात ठेवावे की, आज आमच्या वरीष्ठ नेत्यांबाबत हे घडले. तुमच्याकडेही वरीष्ठ नेते आहेत, आपल्या नेत्यांबाबत असे घडू शकते याची जाण असली पाहिजे. म्हणून विधानसभा अध्यक्षांनी दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. असे जर झाले नाही तर तुमच्या कार्यकाळात अशा घटना घडूनही आपण कारवाई केली नाही हे इतिहासात काळ्या अक्षरात लिहिले जाईल. आता आम्हाला आपल्याकडूनच न्याय व योग्य कार्यवाही करण्याची अपेक्षा आहे. याबाबतीत आपणांस वारंवार भेटून व मागणी करुनही कोणताही निर्णय घेतला नाही हे चुकीचे आहे. या विकृत घटनेबाबत जर निर्णय झाला नाही तर, ही कृती दुसऱ्याही राजकीय नेत्यांच्या बाबतीत होवू शकते हे लक्षात घ्यावे आणि ते दुर्दैवी ठरू शकते म्हणून याबाबतीत आपण निर्णय घ्यावा जो पुढील काळासाठी व लोकशाही प्रणालीसाठी महत्वाचा असल्याचे थोरात यावेळी म्हणाले.

राज्यात आज जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. अवकाळी पाऊस, पीकांचे बाजारभाव यासारखी अनेक संकटे शेतकऱ्यांसमोर असून या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी व तातडीने मदत मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येते. विरोधीपक्ष जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्याचे काम या आंदोलनातून करत असतो. आज आम्ही आंदोलने करीत आहोत, यापूर्वी आपणही अशा प्रकारची आंदोलने केली आहेत, त्यात काहीही चुकीचे नाही. विरोधकांना पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्याचा अधिकार आहे, लोकशाही प्रणालीने हा अधिकार दिलेला आहे. पण दोन दिवसापूर्वी झालेला प्रकार अयोग्य आहे तो पुन्हा होऊ नये यासाठी कारवाई करुन एक संदेश देण्याची आवश्यकता आहे, असेही थोरात म्हणाले.

 

Previous Post

जागतिक डाऊन सिंड्रोम दिनानिमित्त ईटीसी केंद्राद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन

Next Post

गणपती विसर्जनातील गोळीबार प्रकरणी सरवणकरांचा शस्त्र परवाना होणार रद्द

Next Post
गणपती विसर्जनातील गोळीबार प्रकरणी सरवणकरांचा शस्त्र परवाना होणार रद्द

गणपती विसर्जनातील गोळीबार प्रकरणी सरवणकरांचा शस्त्र परवाना होणार रद्द

कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने लिपिक देण्याची नवी मुंबई इंटकची मागणी

जुईनगरमधील पशुवैद्यकीय रुग्णालयास डॉ. वैभव झुंजारे यांचे नाव द्या : रविंद्र सावंत

जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

नेरुळ सेक्टर २, भुखंड क्रं १ येथील महापालिका उद्यानातील पदपथाची दुरुस्ती करा : विद्या भांडेकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com