• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 29, 2022

लालफितीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना भरपाईसाठी करावी लागतेय प्रतिक्षा!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
लालफितीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना भरपाईसाठी करावी लागतेय प्रतिक्षा!

सौ. शितल पिंगळे

मुंबई : लम्पी आजारामुळे देशातील पशूधन संकटात सापडले आहे. मागील दोन महिन्यात पशुधनावर आलेल्या लम्पी रोगाने राज्यात १० हजार जनावरे दगावली आहेत. लम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांच्या पालकांना ताबडतोब आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली खरी, प्रत्यक्षात मात्र हजारो शेतकऱ्यांना ही मदत मिळावी यासाठी पायपीट करावी लागत आहे. अनेक जिल्ह्यांना ओल्या दुष्काळाने घेरलेले असताना घरातले पशुधनही लम्पीने दगावल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. मात्र, लालफितीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास कमालीची दिरंगाई सुरू असल्याचे आकडेवारीमुळे स्पष्ट होत आहे.

ओल्या दुष्काळाने त्रस्त शेतकरी पशूंना होणाऱ्या लम्पी चर्मरोगाने देखील हवालदिल झाला असून राज्यात जवळपास १० हजार पशुधन या रोगाने दगावले असले तरी केवळ २ हजार २०४ पशुधनांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर ७ हजार १३६ मृत पशुधन पडताळणी पूर्ण होऊनही लालफितीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांवर भरपाईसाठी वाट पाहणेच नशिबी आले आहे. शिंदे-फडणवीस सरकार एकीकडे शेतकऱ्यांचा हिताचा दावा करत राज्य कारभार चालवित असले तरी प्रशासनाकडून लम्पीग्रस्तांना मदत मिळण्यात लेटलतिफ कारभाराचा फटका बसल्याने शिंदे-फडणवीस सरकारबाबत शेतकऱ्यांकडून नाराजीचा सूर आळविला जात आहेे.

राज्यात ९ हजार ८४२ पशुधन लम्पी चर्मरोगाने दगावले आहेत. त्यापैकी ७ हजार १३६ जनावरांची पडताळणी पूर्ण झाली असली तरी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केवळ २ हजार ७२३ जनावरांची पडताळणी केली. जवळपास ५ हजारांपेक्षा अधिक जनावरांची अद्याप पडताळणी केलेली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत ९६ हजार ८६२ गाई आणि बैल याना लम्पी आजाराची लागण झाली आहे. तर सर्वाधिक मृत्यू बुलडाणा जिल्ह्यात १,१३० नोंदले गेले आहेत.

पशुधनाचे नुकसान व भरपाई

मृत पशुधनाची संख्या : ९ हजार ८४२

पडताळणी पूर्ण : ७ हजार १३६

नुकसान भरपाईसाठी सादर प्रस्ताव : ३ हजार ६९४

समितीने मंजूर केलेल्या पशुधनाची संख्या : २ हजार ७२३

नुकसान भरपाई अदा केलेले पशुधन : २ हजार २०४

एकूण अदा रक्कम : ५ कोटी ६२ लाख १५ हजार

 

Previous Post

प्रारुप विकास योजना हरकती, सूचना दाखल करण्यासाठी शनिवार, रविवार महापालिका कार्यालये सुरू राहणार

Next Post

मुख्यमंत्री महोदय, मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या वेतनाची दिनांक निश्चित करा : संदीप खांडगेपाटील

Next Post
मुख्यमंत्री महोदय, मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या वेतनाची दिनांक निश्चित करा : संदीप खांडगेपाटील

मुख्यमंत्री महोदय, मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या वेतनाची दिनांक निश्चित करा : संदीप खांडगेपाटील

भारत जोडो यात्रेतून महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी आलो : राहुल गांधी

भारत जोडो यात्रेतून महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी आलो : राहुल गांधी

जुईनगर सेक्टर २३ मधील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा : विद्या भांडेकर

जुईनगर सेक्टर २३ मधील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा : विद्या भांडेकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com