• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 11, 2021

कमी दाबाने पाणीपुरवठा होत राहील्यास विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात मोरबे धरण तयार करणार : मनोज मेहेर

adminbyadmin
in Uncategorized
0
सायन्स पार्क व म्युझियमचे काम महत्वाचे नाही, लसीकरण महत्वाचे : मनोज मेहेर

सुरेंद्र सरोज : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ परिसरात व सारसोळे गावात गेल्या काही महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून यामुळे ग्रामस्थ व रहीवाशी त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नेरूळ विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात विकतचे पाणी आणून मोरबे धरण तयार करण्याचा तसेच यातून काही समस्या निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचा लेखी इशारा महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना एका निवेदनातून दिला  आहे.

गेल्या काही महिन्यापासून नेरूळ सेक्टर ६ परिसरात व सारसोळे गावात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ आणि रहीवाशी त्रस्त झाले आहेत. प्रत्येक वेळी लेखी तक्रार केल्यावर तसेच आंदोलनाचा इशारा दिल्यावर पाणीपुरवठा तीन-चार दिवस व्यवस्थित होतो व नंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ असा प्रकार आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिला वर्ग त्रस्त झाला आहे.  घरात पाण्याची अडचण वादाचा मुद्दा बनत आहे. एकीकडे मोरबेसारखे स्वतंत्र धरण आणि २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची पालिका प्रशासनासह राजकारण्यांकडून केली जाणारी सातत्याने घोषणाबाजी आणि दुसरीकडे  सारसोळेच्या ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर ६ च्या रहीवाशांना सातत्याने करावा लागणारा पाणीटंचाईचा सामना हा विरोधाभास संतापजनक बाब आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही ग्रामस्थ तसेच रहीवाशांसमवेत नेरूळ विभाग अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात विकतचे पाणी आणून मोरबे धरणाची प्रतिकृती निर्माण करू.  सततच्या पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांसह रहीवाशांच्या संयम व सहनशीलतेचा अंत झाल्याने यातून काही समस्या निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

Previous Post

नवी मुंबई महानगरपालिकेने पूरग्रस्त भागात केलेल्या मदतकार्याची चिपळूणकरांनी आभार मानत केली प्रशंसा

Next Post

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याची अडवणूक करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करा : निखिल मांडवे

Next Post
प्रभाग ८७ मधील कंडोनिअम अंर्तगत कामे करा : सौ. सुनिता रतन मांडवे

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याची अडवणूक करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करा : निखिल मांडवे

कार्यकारी अभियंता सुभाष सोनवणेंची चौकशी करा : विजय माने

कार्यकारी अभियंता सुभाष सोनवणेंची चौकशी करा : विजय माने

गृहनिर्माण सोसायट्यांच्या मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : सौ. रूपाली किस्मत भगत

गृहनिर्माण सोसायट्यांच्या मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : सौ. रूपाली किस्मत भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com