• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 27, 2020

राज्यात रक्तसाठा आठलाय, सातच दिवसच पुरेल रक्त, रक्तदात्यांनो आता पुढं या रे ऽऽऽ

adminbyadmin
in Uncategorized
0
राज्यात रक्तसाठा आठलाय, सातच दिवसच पुरेल रक्त, रक्तदात्यांनो आता पुढं या रे ऽऽऽ

आश्विनी भोईर

मुंबई :  ‘राज्यात सध्या सात ते आठ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज लागू शकते. त्यामुळं रक्तदात्यांनी पुढे यावे आणि प्रशासनानेही रक्तदान शिबिरासाठी पूर्ण सहकार्य करावे,’ असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले.
‘करोना’च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील रक्तसाठ्याची वस्तुस्थिती देखील सांगितली. ‘राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. राज्याच्या ब्लड बँकेचे प्रमुख थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याकडं केवळ सात ते आठ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. रक्त दीर्घकाळ साठवून ठेवता येत नाही. रक्ताचे आयुष्य फक्त ३५ दिवसांचे असते. केवळ ‘करोना’च्या रुग्णांसाठी नव्हे, तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये गरजेचे असते. थॅलेसिमिया, हिमोफिलियाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. रक्ताची जागा इतर कुठलेही औषध घेऊ शकत नाही. त्यामुळं रक्तदात्यांनी पुढे यावे,’ असे आवाहन टोपे यांनी केले.

‘संचारबंदीच्या काळातील सूचनांचे पालन करून सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिरे घ्यावीत. जिल्हा व पोलीस प्रशासनाने त्यांना सहकार्य करावे, नव्हे ते केलेच पाहिजे, असे टोपे म्हणाले. अर्थात, रक्तदान शिबिरे घेताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची काळजीही घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आजच्या एका दिवसात तब्बल १७ रुग्णांची भर पडली आहे. सांगलीतील १२ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, देशातील करोनाग्रस्तांचा आकडा ७००च्या पुढे गेला आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारनेही युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.

Previous Post

ईएमआय स्थगितीमुळे मध्यमवर्गीयांना दिलासा!: अशोक चव्हाण

Next Post

युवक काँग्रेस रक्तदानातून पुरवणार राज्याच्या रक्तपेढीस १०,००० रक्ताच्या पिशव्या

Next Post
युवक काँग्रेस रक्तदानातून पुरवणार राज्याच्या रक्तपेढीस १०,००० रक्ताच्या पिशव्या

युवक काँग्रेस रक्तदानातून पुरवणार राज्याच्या रक्तपेढीस १०,००० रक्ताच्या पिशव्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

करोनाग्रस्त परिस्थितीत अनेक संस्था, व्यक्ती यांचा मदतीचा हात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांच्या खिशातून होतेय जंतुनाशक फवारणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com