• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 1, 2020

समाजमाध्यमांवरील अपप्रचार रोखण्याबाबत राज्य सरकारने उपाय करावेत !: सचिन सावंत

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रधानमंत्री आवास योजनेच्या १४ हजार कोटींच्या निविदेतही भ्रष्टाचारः सचिन सावंत

मुंबई  : समाजमाध्यमातून अत्यंत व्देषपूर्ण अपप्रचार करुन सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात केले जात असून असे प्रयत्न करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. खोटी माहिती पसरवून सामाजिक एकतेला बाधा पोहचवण्याचे काम समाजमाध्यमातून काही समाजकंटक करत आहेत, त्याला पायबंद घालावा यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून उपाय करण्याची मागणी केली आहे.

या पत्रात सावंत यांनी असे म्हटले आहे की, लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याकरीता खोट्या माहितीचा प्रसार इतर पक्षांच्या नेत्यांचे चारित्र्यहनन व अफवा पसरवणारी माहिती पसरवली जात आहे. याकरीता भारतीय जनता पार्टी  हजारो कोटी रुपये खर्च करते आणि काही खाजगी व्यावसायीक कंपन्या देखील त्यांनी नियुक्त केल्या आहेत अशी माहिती मिळते. सर्वोच्च न्यायालयाने २०१५ साली आपल्या निकालाअन्वये आयटी ऍक्टमधील कलम ६६ (अ) रद्दबादल केल्यानंतर सायबर कायदा बऱ्याच अंशाने कमजोर झाला आहे. याचाच फायदा भाजपाची ही मंडळी आणि समाजकंटक उचलत आहेत. भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते तर समाजमाध्यमातून खुल्या पद्धतीने चिथावणीखोर भाषा समाजमाध्यमात वापरत असतात. यातून देशाची आणि राज्याची सामाजिक एकता आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात येत आहे. राज्यात सामाजिक एकतेचे वातावरण अबाधित रहावे याची जबाबदारी  शासनाची आहे. त्यामुळे या अपप्रचारावर नियंत्रण आणून अशा  समाजकंटाकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. समाजमाध्यमाचा दूरुपयोग मोठ्या प्रमाणात केला जात असून दिल्लीत झालेल्या दंगलीत पुन्हा याचा प्रत्यय आला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यामधील प्रत्येक जिल्हा आणि शहरामध्ये सायबर पोलीस स्टेशन निर्माण करण्याचा निर्णय झाला होता,याकरता स्वतंत्र आणि मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग हा त्याच कामाकरीता नियुक्त करण्यात यावा आणि त्याकरीता प्राथमिकता ओळखून मोठ्या प्रमाणात तांत्रिक साधने आणि निधी देण्यात यावा. प्रत्येक जिल्ह्यात सोशल मॉनिटरिंग सेल प्रभावीपणे कार्यरत करावा. जे नागरिकांच्या तक्रारींच्यावरती तत्काळ कारवाई करतील. सहजगत्या तक्रार करता यावी याकरता पोलीस विभागाने एक व्हॉट्सअप क्रमांक व समाजमाध्यमांवरती तक्रार करण्याकरीता त्या-त्या माध्यमांवर पोलिस विभागाचे समाजमाध्यम खातं निर्माण करावे. आयटी ऍक्टमधील कलम ६६ (अ) रद्द झाल्याने राज्यात वेगळा कायदा करता येईल का याकरता विचार व्हावा, आदी मागण्या सावंत यांनी केल्या आहेत.

Previous Post

२६ मार्चला अंतिम मतदार यादी होणार प्रकाशित

Next Post

तेजस शिंदेंना प्रभाग ८५ मधून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीचे घटक आग्रही?

Next Post
तेजस शिंदेंना प्रभाग ८५ मधून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीचे घटक आग्रही?

तेजस शिंदेंना प्रभाग ८५ मधून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीचे घटक आग्रही?

लोणीच्या ‘टायगर’ने कांदा बटाटा मार्केटचा गड अखेर तिसऱ्यांदा राखलाच!

लोणीच्या ‘टायगर’ने कांदा बटाटा मार्केटचा गड अखेर तिसऱ्यांदा राखलाच!

मनविसेच्या पाठपुराव्यानंतर शिक्षण विभागाला आली जाग !

मनविसेच्या पाठपुराव्यानंतर शिक्षण विभागाला आली जाग !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com