• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 16, 2020

नवी मुंबईच्या जडण घडणीत रामभाऊंचे योगदान महत्वाचे : गणेश नाईक

adminbyadmin
in Uncategorized
0
नवी मुंबईच्या जडण घडणीत रामभाऊंचे योगदान महत्वाचे : गणेश नाईक

रामभाऊ पाटील यांना हंसारामबुवा नेरुळकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

 नवी मुंबई : रामभाऊ हे केवळ वाशी गावचे सुपुत्र नसून संपूर्ण नवी मुंबईचे सुपुत्र आहेत. लेखक, दिग्दर्शक, नाट्यकलावंत, भजन प्रेमी, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता अशा बहुआयामी व कलंदर व्यक्तिमत्त्वाच्या रामभाऊंचे नवी मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन लोकनेते गणेश नाईक यांनी वाशी येथे केले.

 नवी मुंबई भूषण रामभाऊ पाटील यांच्या ७५व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त वाशी येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी रामभाऊ पाटील यांना गणेश नाईक यांच्या हस्ते भजनयात्री हंसारामबुवा नेरुळकर प्रतिष्ठानच्या हंसारामबुवा नेरुळकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 व्यासपीठावर  महापौर जयवंत सुतार, माजी खासदार संजीव नाईक, दत्तूशेठ पाटील,सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक विजय पाटील, हंसारामबुवा नेरुळकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमृत पाटील नेरुळकर, लोक कलावंत दामोदर शिरवाळे, सुप्रसिद्ध जादूगार संजय कुमार, आदी उपस्थित होते.        

रामभाऊ पाटील हे कलावंतांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून त्यांच्या स्वभावातील शालीनता पाहिली की रामभाऊ पाटील हे खरोखरच आगरी समाजातील आहेत का असा प्रश्न पडतो. असे गौरवोद्गार महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी काढले.

यावेळी कळवा बेलापूर विभागातील भजन कलावंतांच्या ‘भजन संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात महादेवबुवा शहाबाजकर, अशोकबुवा म्हात्रे, बाळारामबुवा पाटील, गजेंद्रबुवा तांडेल, दत्ताबुवा नाईक आदी भजन कलावंतांनी भजने सादर केली.

गौरवमूर्ती रामभाऊ पाटील यांनी यावेळी अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या आयोजकांचे, मान्यवरांचे हितचिंतकांचे तसेच हंसारामबुवा नेरुळकर प्रतिष्ठानचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करतानाच मी या क्षेत्रात पूर्णतः आनंदी, समाधानी असल्याचे सांगून शेवटच्या श्वासापर्यंत हा देह सत्कारणी लागावा अशी मनिषा व्यक्त केली.

Previous Post

स्मशानभूमीमध्ये ध्वनीक्षेपक यंत्रणा बसविण्याची महापौरांची मागणी

Next Post

महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा: महापौर

Next Post
महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा: महापौर

महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा: महापौर

मनोरंजक लघुपटांतून युवकांनी दिला स्वच्छ सर्वेक्षण २०२० चा संदेश

मनोरंजक लघुपटांतून युवकांनी दिला स्वच्छ सर्वेक्षण २०२० चा संदेश

नेरूळमध्ये रो-हाऊसचा स्लॅप कोसळला

नेरूळमध्ये रो-हाऊसचा स्लॅप कोसळला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com