• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 20, 2019

आचारसंहितेत कामगार अडकल्याने बकालपणात वाढ!

adminbyadmin
in Uncategorized
0
आचारसंहितेत कामगार अडकल्याने बकालपणात वाढ!
आचारसंहितेच्या नावाखाली डेेब्रिजचे ढिगारे हटविण्यास महापालिका नेरूळ विभाग कार्यालयाची टाळाटाळ

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ :navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : गेल्या एक महिन्यापासून नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे अधिकाधिक कर्मचारी निवडणूक कामात अडकल्याने शहरातील ठिकठिकाणी विखुरलेला कचरा, डेब्रिज, रॅबिट व पदपथावरील साहित्य उचलण्यास महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. नगरसेवकांनी सतत पाठपुरावा करूनही निवडणूकीमुळे कर्मचारीच नसल्याचे सांगत महापालिकेचे विभाग अधिकारी, उपायुक्तही आपली हतबलता व्यक्त करू लागले आहेत. निवडणूकीमुळे शहरातील बकालपणात वाढ होवू लागल्याने रहीवाशी पालिका प्रशासनाप्रती संताप व्यक्त करू लागले आहेत.

नेरूळ, सानपाडा, जुईनगर परिसराला बकालपणा आला असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. नेरूळ सेक्टर १६ ए परिसरातील भुखंड क्रं ६९ समोरील पदपथ आणि नेरूळ सेक्टर १८ येथील जय भवानी सोसायटीसमोरील पदपथावर गेल्या एक महिन्यापासून मातीचे व डेब्रिजचे ढिगारे व सुका कचरा, ओला कचरा याचे ढिगारे पडून आहेत. मागील काही दिवसापासून येथील रहीवाशांना पदपथाचा वापरही करता येत नाही. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रहीवाशांना साथीच्या आजाराचाही सामना करावा लागत आहे. परिसराला बकालपणाचेही गालबोट लागले आहे.

नेरूळ सेक्टर १६, १८ येथील पदपथावर असलेले हे ढिगारे व कचरा हटविण्यासाठी भाजपच्या स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत या गेल्या पंचवीस दिवसापासून नेरूळ विभाग कार्यालयात चपला झिजवित आहेत. तोंडी सांगूनही दखल घेतली जात नसल्याने नगरसेविका रूपाली भगत यांनी विभाग अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी करून डेब्रिज व कचरा हटविण्याची सतत मागणी केली आहे. तथापि आचारसंहितेमुळे निवडणूक कामात पालिका कर्मचारी व्यस्त असल्याने पालिका विभाग अधिकारी आपली हतबलता व्यक्त करत आहेत.  निवडणूकीनंतर मतदान संपायची आपण वाट पाहत आहोत, आपणास कोणताही निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मांण करायचा नाही, परंतु मतदान संपताच आपण दोन दिवसात कचरा व ढिगारे न हटविल्यास तो कचरा व ढिगारे विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात नेवून पांगविणार असल्याचा संतप्त इशारा नगरसेविका रूपाली किसमत भगत यांनी दिला आहे.

Previous Post

माथाडी कामगार गावी गेल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस चिंतेत!

Next Post

मतदानाने लोकशाही सदृढ होते :लोकनेते गणेश नाईक

Next Post
मतदानाने लोकशाही सदृढ होते :लोकनेते गणेश नाईक

मतदानाने लोकशाही सदृढ होते :लोकनेते गणेश नाईक

आजपासून नेरूळमध्ये स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्याची विक्री

आजपासून नेरूळमध्ये स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्याची विक्री

शिवसेनेची भूमिका सत्ता संपादनात ठरणार महत्वाची

शिवसेनेची भूमिका सत्ता संपादनात ठरणार महत्वाची

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com