• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 29, 2019

ए.पी.एम.सी अतिरिक्त बाजार आवारातील गाळ्यांचे उदघाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

adminbyadmin
in Uncategorized
0

नवी मुंबई :-  वाशी नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अतिरीक्त भाजीपाला आवारात कृषीपूरक व्यवसाय करण्याकरिता 285 गाळ्यांचा 10 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने मार्गी लागला असून मंजूर झालेल्या ए.पी.एम.सी 285 गाळ्यांचे अतिरिक्त बाजार आवाराचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे आदरणीय महसूल मंत्री तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील, वडार समाजाचे अध्यक्ष श्री. विजय चौगुले, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. रामचंद्र घरत, माजी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक व अध्यक्ष श्री. सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण, शंकरशेठ पिंगळे, संजय पानसरे, रमेश किस्ते, अभियंता पांडुरंग पिंगळे, कैलास ताजणे, रामदास चासकर, अँड. राहुल पवार, बाळासाहेब बोरकर तसेच शेकडो व्यापारी उपस्थित होते. ए.पी.एम.सी.तील अतिरिक्त भाजीपाला आवारात सन २००९ पासून भाजीपाला होत नसल्याने तेथील बंद गाळ्यांमध्ये कृषीपूरक व्यवसाय सुरु करण्याची परवानगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने दिली गेली होती. एपीएमसीतील अतिरिक्त भाजीपाला आवारामधील गाळेधारकांना कृषीपूरक शेतमाल विक्रीकरिता परवानगी देण्यासाठी त्यांनी पणन विभागाकडे पाठपुरावा केला होता. अतिरिक्त भाजीपाला आवारातील २८५ गाळ्यांमध्ये भाजीपाला व्यवसाय होत नसल्याने 10 वर्षापासून हे गाळे बंद अवस्थेत होते. त्यामुळे या गाळ्यांमध्ये कृषीपूरक व्यवसाय सुरु करण्याची मागणी गाळेधारकांकडून करण्यात येत होती. या गाळेधारकांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची भेट घेतली होती. त्या नुसार आमदार मंदाताई म्हात्रे यांनी याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित केला होता व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्याचा पाठपुरावा केला होता. त्यावेळी कृषी पूरक व्यवसाय करण्यास परवनागी देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला होता.

        यावेळी राज्याचे महसूल मंत्री ना.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले की, सदर मार्केटचा विषय मी पणन मंत्री असताना आमदार मंदाताई यांनी माझ्याकडे आणला. त्यावेळी त्यांनी माझ्याकडे सतत पाठपुरावा करून वारंवार बैठका लावून येणाऱ्या अडचणींना सामोरे जाऊन सदर बाजार आवारातील गाळ्यांना मंजुरी करून घेतली व भूमिपूजन झाल्यावर फक्त एका वर्षात सदर बाजार आवाराचे उदघाटनही आज करून घेतले. त्यामुळे आमदार मंदाताई यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, गेल्या 10 वर्षापासुनचा  प्रलंबित प्रश्न घेऊन ए.पी.एम.सी. अतिरिक्त भाजीपाला व्यापाऱ्यांनी माझ्याकडे निवेदन दिले असता राज्याचे तत्कालीन पणन मंत्री श्री.चंद्रकांतदादा पाटील यांजकडे सदरबाबत सतत पाठपुरावा करून त्याकरिता 3 महत्वाच्या बैठका घेऊन हा प्रश्न पूर्णत्वास नेला. त्याकरिता त्वरित निर्णय घेणाऱ्या मा. मंत्री महोदय श्री.चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अतिरीक्त भाजीपाला आवारात कृषीपूरक व्यवसाय आता करण्यात येणार असल्याने व्यापाऱ्यांचा आनंदही द्विगुणीत झाला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा मार्केट म्हणून ए.पी.एम.सी. चा उल्लेख होत असून सर्वात मोठी उलाढाल या मार्केटमध्ये होत असते. संपूर्ण मुंबई कृषी उत्पन्न बाजार हा आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाल्यास त्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे सदर मार्केट आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याची मागणी मंत्री महोदयांकडे करण्यात आली आहे. आज अतिरिक्त भाजीपाला आवारातील 285 गाळे व्यापाराकरिता खुले झाल्याने व्यापारांचा व त्यांच्या कुटुंबियांचा आनंद पाहून समाधान वाटत असल्याचे सांगत सर्व व्यापाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी ए.पी.एम.सी. चे प्रशासक व अतिरिक्त आयुक्त श्री. सतीश सोनी यांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानत ताईंच्या कष्टाने या 285 गाळ्यांमुळे व्यापाऱ्यांच्या कुटुंबाला आधार देऊन त्यांचे जीवन सार्थक केल्याचे मत व्यक्त केले.

या मार्केटसाठी आमदार झाल्यापासून सौ. मंदाताई म्हात्रेंनी केलेल्या प्रयत्नांचे आज सार्थक झाले असल्याची प्रतिक्रिया मार्केटमधील घटकांनी व्यक्त केली आहे.
Previous Post

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना ‘भारतरत्न’ने सन्मानीत करा!: विजय वडेट्टीवार

Next Post

प्रभागातील मार्केटची दुरावस्था दूर करण्याची मागणी

Next Post
प्रभागातील मार्केटची दुरावस्था दूर करण्याची मागणी

प्रभागातील मार्केटची दुरावस्था दूर करण्याची मागणी

प्रधानमंत्री आवास योजनेच्या १४ हजार कोटींच्या निविदेतही भ्रष्टाचारः सचिन सावंत

प्रधानमंत्री आवास योजनेच्या १४ हजार कोटींच्या निविदेतही भ्रष्टाचारः सचिन सावंत

सानपाड्याची मानाची ‘साईहंडी’ आम्ही नेरुळकरांनी फोडली

सानपाड्याची मानाची 'साईहंडी' आम्ही नेरुळकरांनी फोडली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com