• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 19, 2019

मोदी सरकारच्या हुकूमशाही कारभारामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात

adminbyadmin
in मुंबई
0
राज्याला नैसर्गिक संकटात सोडून मुख्यमंत्री प्रचारात मग्न

नाना पटोले यांचा आरोप ; आयुध निर्माणी मध्ये खाजगीकरणाला विरोध

मुंबई : देशभरात खाजगीकरणाचा सपाटा लावलेल्या भाजप सरकारने आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत आयुध निर्माणी संस्थांमध्ये सुद्धा खाजगीकरणाचा डाव रचला आहे. या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा या गोष्टीला विरोध आहे. मात्र हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खाजगी कंपन्यांच्या फायद्यासाठी देशाची सुरक्षाच धोक्यात आणत आहेत, असा थेट आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी केला आहे.

देशभरातील आयुध निर्माण संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने हे प्रस्तावित खाजगीकरण मागे घ्यावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. देशात बहुधा प्रथमच आयुध निर्माणी संस्थांचे कर्मचारी एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. मात्र सरकार दडपशाही करून त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे. अंबानी अदानींचे सरकार अशीच सामान्य जनतेमध्ये प्रतिमा असलेले केंद्रातील मोदी सरकार देशातील सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगीकरण आणून सरकारी कंपन्या विकत आहेत.

बिएसएनएल, रेल्वे, एअर इंडीया, पेट्रोलियम यासह इतर महत्वाच्या क्षेत्रातही खाजगीकरणाचे धोरण सरकार आखत आहे. एकीकडे देशाची आर्थिक व्यवस्था खालावत चालली आहे. त्यामुळे बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. अशातच सुरक्षेशी निगडीत असलेल्या आयुध निर्माणी मध्ये सुद्धा खाजगीकरण करून सरकार देशाची सुरक्षाच खाजगी कंपन्यांच्या हातात देत आहेत असा आरोप पटोले यांनी केला. एकीकडे भाजपाचे नेते व समर्थक’देश सुरक्षीत हातो में’ असा प्रचार जोमात करतात. मात्र सुरक्षेशी खेळ करण्याचा हा प्रयत्न भविष्यासाठी घातक ठरणार आहे असे पटोले म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत खाजगी कंपन्यांकडून घेतलेल्या प्रचंड मदतीची परतफेड करण्यासाठीच मोदी सरकार सर्वत्र खाजगीकरण करत आहे असेही ते म्हणाले.

Previous Post

ठाणे जिल्ह्यातील राजकारणात चर्चा गणेश नाईकांच्या संभाव्य पक्षांतरांचीच

Next Post

परदेशात एम.बी.बी.एस शिक्षण काळाची गरज

Next Post
परदेशात एम.बी.बी.एस शिक्षण काळाची गरज

परदेशात एम.बी.बी.एस शिक्षण काळाची गरज

वंचित बहूजन आघाडीत ठाणे जिल्ह्यातील विधानसभेसाठी इच्छूकांच्या मुलाखती

वंचित बहूजन आघाडीत ठाणे जिल्ह्यातील विधानसभेसाठी इच्छूकांच्या मुलाखती

सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीतील अंत्यविधीसाठी उभारलेल्या लोखंडी चौथऱ्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी

सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीतील अंत्यविधीसाठी उभारलेल्या लोखंडी चौथऱ्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com