• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 10, 2019

राज्यातील पूरस्थिती अतिशय गंभीर; राष्ट्रीय आपत्ती घोषीत करा !

adminbyadmin
in मुंबई
0
डोंगरी इमारत दुर्घटनेतील दोषींवर ३०२ चा गुन्हा दाखल करा !: विजय वडेट्टीवार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

मुंबई : राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन अपरिमित हानी झालेली आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यात महापुराने थैमान घातले असून अनेक भागात मागील चार दिवसापासून पुरपातळी अद्यापही कमी झालेली नाही. आजही या परिसरातील हजारो कुटूंबे पुरग्रस्त भागात मदतविना अडकलेली आहेत. पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा भागाला शुक्रवारी भेट देऊन आल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यावर आलेले संकट राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करावी, अशी मागणी केली.  

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात वडेट्टीवार यांनी असे नमूद केले आहे की, कोल्हापुरातील २३९ गावांतील सुमारे १ लाख १२ हजार लोक तसेच सांगली जिल्ह्यातील १ लाख, ३५ हजार लोक स्थलांतरित झाले आहेत. अद्यापही हजारो कुटूंबिय पुरग्रस्त भागात अडकलेले असून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. या पुरामुळे राज्यातील सुमारे ६८ हजार खरीप क्षेत्र नष्ट झाले आहे. पुरामुळे घरे, दुकाने, शासकीय इमारती, शाळा, बाजारपेठा यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच पुरात जनावरांचे मृत्यु झाल्याने मृत जनावरांच्या शरीराच्या विघटनामुळे परिसरात महामारी, साथीच्या रोंगाचा प्रार्दुभाव होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. या परिसरातील स्थिती सर्वसामान्य होवून जनजीवन सुरळीत होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकेल. या अभुतपुर्व पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेती व जनावरांच्या नुकसानामुळे त्याभागात तसेच आसपासच्या परिसरात अन्न, धान्य, भाजीपाला, दुध, इंधन, औषधांचा तुटवडा निर्माण होणार आहे.

पूरग्रस्त भागातील जीवनमान सुरळीत होण्यासाठी या नैसर्गिक आपत्तीस राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यातील सर्व नदी खोरे परिसरात महापुराची परिस्थिती दीर्घकाळ राहू नये यासाठी उपाययोजना निश्चित करुन त्याची कालबद्ध अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास उच्चस्तरीय तज्ञांचा गट निर्माण करावयाचा असल्यास तातडीने निर्णय घ्यावा. राज्यातील विविध प्रकारच्या आपत्ती निवारणासाठी सद्य:स्थिती असलेली आपत्ती निवारण यंत्रणा ही जागतिक दर्जाची करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. पूरग्रस्त परिसरातील स्थिती सर्वसामान्य होवून जनजीवन सुरळीत होण्यासाठी विशेष कृती दले तयार करुन विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा. पूरग्रस्तांना मदत करतांना या आपत्तीमधून बाहेर पडण्यासाठी आपत्तीग्रस्तांना आवश्यक बळ मिळेल अशी मदत शासनाकडून उपलब्ध करुन द्यावी, असेही या पत्रात म्हटले आहे.

Previous Post

पूरग्रस्त भागातील नागरीकांना मदत देण्याकरीता 154 कोटी तातडीने वितरीत – मुख्य सचिवांची माहिती

Next Post

मुंबईच्या नालेसफाईत निघाले फर्निचरचे सामान

Next Post
मुंबईच्या नालेसफाईत निघाले फर्निचरचे सामान

मुंबईच्या नालेसफाईत निघाले फर्निचरचे सामान

भगवती रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रूग्णालय उभारा – शितल म्हात्रे

भगवती रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रूग्णालय उभारा - शितल म्हात्रे

महाराष्ट्रातील पूरग्रस्त बंधू भगिनींसाठी भगत परिवाराकडून एक हात मदतीचा

महाराष्ट्रातील पूरग्रस्त बंधू भगिनींसाठी भगत परिवाराकडून एक हात मदतीचा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com