• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 2, 2019

अण्णाभाऊंच्या विचारांमध्ये जातीभेद, विषमता संपवून समता प्रस्थापित करण्याची ताकद: आ. बाळासाहेब थोरात

adminbyadmin
in मुंबई
0
अण्णाभाऊंच्या विचारांमध्ये जातीभेद, विषमता संपवून समता प्रस्थापित करण्याची ताकद: आ. बाळासाहेब थोरात

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com 

संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाहीरांच्या विचारानेच वाटचाल करावी लागेल

मुंबई : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरणादायक आहेत. आज संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानेच आपल्या सर्वांना वाटचाल करावी लागणार आहे. जातीभेद, विषमता संपवून समता प्रस्थापित करण्याची ताकद लोकशाहीरांच्या विचारात आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. 

लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी चेंबूरच्या सुमन नगर येथे अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यानंतर अभिवादन सभेत बोलताना आ. बाळासाहेब थोरात म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकर यांचा प्रभाव असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची देशाला गरज आहे. अण्णाभाऊंचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. इथून पुढच्या कालखंडात त्याच विचाराने आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे.  राज्यघटना आणि लोकशाही टिकली पाहिजे असे जर सर्वांना वाटत असेल तर अण्णाभाऊंच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपणा सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. जातीभेद, धर्मभेद, विषमता संपवून समतेचे तत्व पुढे नेण्यासाठी अण्णाभाऊंचा विचार टिकणं महत्त्वाचे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंचे काव्य महत्वाचे ठरले होते याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे केले जाणार आहे. यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी  केले.

तत्पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गिरगाव चौपाटी येथे थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

Previous Post

मनोज मेहेर यांचा प्रभाग समिती सदस्यपदाचा राजीनामा

Next Post

शनिवारी नेरूळमध्ये रक्तदान शिबिर

Next Post
शनिवारी नेरूळमध्ये रक्तदान शिबिर

शनिवारी नेरूळमध्ये रक्तदान शिबिर

अशोक गावडे अखेर राष्ट्रवादीतच राहणार

अशोक गावडे अखेर राष्ट्रवादीतच राहणार

नेरूळ सेक्टर १८ परिसरातील विद्युत उपकेंद्रात बसणाऱ्या मद्यपिंचा बंदोबस्त करून गस्त वाढविण्याची मागणी

नेरूळ सेक्टर १८ परिसरातील विद्युत उपकेंद्रात बसणाऱ्या मद्यपिंचा बंदोबस्त करून गस्त वाढविण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com