• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2019

हे सरकार आहे की कुंभकर्ण?

adminbyadmin
in मुंबई
0
लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?: खा. अशोक चव्हाण

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

शेतकरी आंदोलनाबाबतच्या दिरंगाईवर अशोक चव्हाण यांचा संतप्त सवाल

मुंबई : हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकरी आंदोलनाची दखल घ्यायला भाजप-शिवसेनेच्या सरकारला आठ-आठ दिवस का लागतात? हे सरकार आहे की कुंभकर्ण? असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

कर्जमाफी आणि पीकविम्याच्या प्रमुख मागणीसाठी सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेण्यास झालेल्या दिरंगाईवर संताप व्यक्त करताना त्यांनी भाजप-शिवसेना सरकार निष्क्रिय, उदासीन आणि असंवेदनशील असल्याची जोरदार तोफ डागली. ते म्हणाले की,ताकतोडा येथील गावकऱ्यांना अद्याप शेतकरी कर्जमाफी व पीकविम्याची भरपाई मिळालेली नाही. गेल्या वर्षी सेनगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला होता. ताकतोडा येथे दुष्काळ असल्याचे सरकारनेच जाहीर केले. तरीही या भागातील सोयाबीनसारख्या प्रमुख पिकाला विमा कंपन्यांकडून भरपाई मिळाली नाही. सरकारकडे दाद मागितल्यावर त्याची दखल घेतली जात नव्हती. सरतेशेवटी ताकतोडाच्या नागरिकांना गाव विकायला काढल्याची घोषणा केली. २२ जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. सरतेशेवटी आज जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिबीर लावून तक्रारींचे निवारण करण्याचे आश्वासन दिले असले तरी शेतकऱ्यांच्या हातात भरपाईची रक्कम मिळेस्तोवर सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. कर्जमाफी आणि पिकविम्याची समस्या केवळ ताकतोडासारख्या एखाद्या गावाची नसून, सार्वत्रिक स्वरूपाची आहे. त्यामुळे सर्वच गावात तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन करण्याऐवजी केवळ एकाच गावात सुरू करण्याची विचित्र भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे आता नजीकच्या हाताळा येथेही आंदोलन होणार असल्याची माहिती मिळते आहे.

पीकविम्याबाबतचे नियम शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. यासंदर्भात सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. परंतु,शेतकऱ्यांसाठी असे ठोस निर्णय घेण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही. हा प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोडविण्याऐवजी शिवसेनेसारखासत्ताधारी पक्ष पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयांवर मोर्चे काढण्याचे ‘इव्हेंट’ करतो. दुसरीकडे विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांची मोठी जाहिरात आजच प्रसिद्ध केली. न्याय मिळत नसल्याने एकिकडे शेतकरी आठ-आठ दिवस आंदोलन करतात आणि दुसरीकडे हे सरकारजनतेच्या तिजोरीतील लाखो रूपयांची उधळपट्टी करून फसव्या जाहिराती प्रकाशित करते, असे सांगून भाजप-शिवसेना सरकारच्या करणी आणि कथनीत फरक असल्याचा आरोप त्यांनी केला.

Previous Post

मतांच्या जोगव्यासाठी यात्रा काढण्याऐवजी दुष्काळी भागाचा दौरा करा: सचिन सावंत

Next Post

केंद्र व राज्य सरकारची किमान वेतनवाढ कामगारांची थट्टा करणारी !: विजय वडेट्टीवार

Next Post
डोंगरी इमारत दुर्घटनेतील दोषींवर ३०२ चा गुन्हा दाखल करा !: विजय वडेट्टीवार

केंद्र व राज्य सरकारची किमान वेतनवाढ कामगारांची थट्टा करणारी !: विजय वडेट्टीवार

अण्णासाहेब मिसाळ यांनी स्विकारला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार

स्थायी समितीची विविध नागरी सुविधा कामांस मंजूरी

सिवूडस सेक्टर ४८ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरावस्था

सिवूडस सेक्टर ४८ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरावस्था

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com