• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 16, 2019

डोंगरी इमारत दुर्घटनेतील दोषींवर ३०२ चा गुन्हा दाखल करा !: विजय वडेट्टीवार

adminbyadmin
in मुंबई
0
डोंगरी इमारत दुर्घटनेतील दोषींवर ३०२ चा गुन्हा दाखल करा !: विजय वडेट्टीवार

मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये द्या.

मुंबई : मुंबईतील डोंगरी भागातील केसरबाई इमारत दुर्घटनेला म्हाडा, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार जबाबदार असून संबंधित सर्वांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा आणि  मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

घटनास्थळाला भेट दिल्यानंतर वडेट्टीवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, या शंभर वर्ष जुन्या असलेल्या केसरबाई इमारतीत १५ कुटुंबे राहत होती. ही इमारत धोकादायक होती पण मुंबई महानगरपालिकेने फक्त नोटीस बजावण्याचे काम पार पाडले. या इमारतीचे वेळीच ऑडीट करुन पुनर्विकास केला असता तर आजची दुर्घटना टाळता आली असती. पण प्रशासन योग्यवेळी कधीच  कारवाई करत नाही. दुर्घटनेनंतर आता सरकारचे मंत्री भेटी देऊन चौकशी करण्याची भाषा करत आहेत. पण दुर्घटना होऊ नये म्हणून ठोस उपाययोजना का केल्या नाहीत. मुंबई महानगरपालिका प्रशासन झोपा काढते आणि दुर्घटना झाल्यावर कारवाईचे नाटक करते.

मुंबईत १४ हजार इमारती धोकादायक आहेत. या इमारतीतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. यासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. मुख्यमंत्र्यांना वारंवार पत्र पाठवले, डोंगरी भागातील धोकादायक इमारतीसंदर्भातही महानगरपालिकेला पत्र पाठवून या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे, अशा इमारतींचा पुनर्विकास करावा यासाठी पाठपुरावा करुनही त्याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले गेले नाही. यंदाच्या  पावसाळ्यात मुंबईत आतापर्यंत ४० च्या वर लोकांचे वेगवेगळ्या दुर्घटनेत बळी गेले आहेत. गटाराचे झाकण उघडे असल्याने त्यात पडून दोन मुलांचा मृत्यू झाला. आणखी किती बळी गेल्यावर मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारला जाग येणार आहे, असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षांपासून शिवसेना-भाजपची सत्ता आहे. पण दरवर्षी पावसाळ्यात इमारत दुर्घटना होऊन निष्पाप लोकांचे बळी जातात. दरवर्षी अशा दुर्घटना झाल्यानंतर चौकशीचा फार्स केला जातो, किरकोळ कारवाई केली जाते पण ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. महानगरपालिका, राज्य सरकारची यंत्रणा असताना बेकायदा बांधकामं फोफावताच कशी? मुंबई महानगरपालिकेच्या या गलथान कारभारामुळेच दरवर्षी पावसाळ्यात निष्पाप लोकांचे जीव जातात. डोंगरी भागातल्या या इमारतीचाही वेळीच पुनर्विकास केला असता तर आजची दुर्घटना टळली असती,असे वडेट्टीवार म्हणाले.   

Previous Post

अन्यथा आम्हाला प्लास्टिक पिशव्या वापरण्याची परवानगी द्या

Next Post

मुंबई शहराबाबत भाजप-शिवसेनेची निष्क्रियता चव्हाट्यावर!: अशोक चव्हाण

Next Post
ऑगस्टाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाः खा. अशोक चव्हाण

मुंबई शहराबाबत भाजप-शिवसेनेची निष्क्रियता चव्हाट्यावर!: अशोक चव्हाण

नेरूळ विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक कारवाई

नेरूळ विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक कारवाई

आ. मंदाताईं म्हात्रेंच्या हस्ते आमदार निधीमधून ओपन जिमचे लोकार्पण

आ. मंदाताईं म्हात्रेंच्या हस्ते आमदार निधीमधून ओपन जिमचे लोकार्पण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com