• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 9, 2019

मनसेला आघाडीसोबत घेण्यास काँग्रेस अनुकूल

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
सर्वच राज्यात कॉंग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग असताना महाराष्ट्रातच आऊटगोईंग कशी?

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत काँग्रेस अनुकूल असल्याचे संकेत काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले. चव्हाण नागपुरात सोमवारी एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी यूपीए अध्यक्षा आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ सोनिया गांधी यांची नवी दिल्ली निवासस्थानी भेट घेतली. या पाश्र्वभूमीवर चव्हाण  यांचे विधान महत्त्वाचे ठरते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला आघाडीत घेण्यात पक्षात मतभिन्नता होती. पण, आता मत परिवर्तन झाले आहे. गरज भासल्यास आणि आघाडीतील इतर घटक पक्षांचा आक्षेप नसल्यास काँग्रेस मनसेला आघाडीत घेण्यात सकारात्मक आहे, असेही  चव्हाण म्हणाले.

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देशातील इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरू आहे. पण  सर्व काही लवकरच सुरळीत होईल. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू असून उमेदावारीसाठी अनेक इच्छुक आहे. पक्ष सर्व ताकदीनिशी निवडणूक लढेल. कर्नाटकात काँग्रेस आणि जद (संयुक्त) सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. आमदार फोडून त्यांना आणण्यासाठी मुंबईहून बंगळुरूला विशेष विमान पाठवण्यात आले, असेही ते म्हणाले.

ईव्हीएमबद्दलचे सर्व मुद्दे आम्ही मांडले आहे. ईव्हीएमबद्दल संशय आहे, परंतु आज आमच्याकडे पुरावे नाहीत. मात्र, एक ना एक दिवस सत्य जगासमोर येईल, असा दावा त्यांनी केला. अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यपदाचा गेल्या महिन्यात राजीनामा दिला. पक्ष नवीन अध्यक्ष निवड करेपर्यंत ते प्रभार सांभाळत आहेत.

जागा वाटपाची चर्चा लवकरच

राष्ट्रवादी आणि आघाडीतील राजू शेट्टी यांचा पक्ष, सीपीएम आणि इतर समविचारी पक्षाशी जागा वाटपाबाबत लवकर चर्चा केली जाणार आहे. यावेळी जागावाटपाचे नवीन सूत्र सुचवण्यात आले आहे. ज्या जागेवर विद्यमान बळ आणि जिंकण्याची क्षमता असेल, त्यावर त्या पक्षाचा दावा राहील. २००९ प्रमाणे जागावाटप होणार नाही, असेही चव्हाण म्हणाले.

Previous Post

रिक्षा चालक संघटनांनी मध्यरात्रीपासून पुकारलेला बेमुदत संप मागे

Next Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रनिर्मितीशी संबंध काय?:अशोक चव्हाण

Next Post
लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?: खा. अशोक चव्हाण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रनिर्मितीशी संबंध काय?:अशोक चव्हाण

आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केली नवी मुंबईतील पावसाळी स्थितीची पाहणी

आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केली नवी मुंबईतील पावसाळी स्थितीची पाहणी

लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?: खा. अशोक चव्हाण

पीकविम्यासाठी मोर्चा हा शिवसेनेचा ‘स्टंट’!: अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com