• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 10, 2019

या असहिष्णुतेचा अंत जनताच करेलः सचिन सावंत

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

मुंबई : देशपातळीवर गेल्या पाच वर्षापासून असहिष्णुतेचे वातावरण पहायला, अनुभवायला मिळते आहे. अमोल पालेकर यांना बोलू न देणे ही घटना त्याचाच एक भाग आहे. लोकतांत्रिक विचारधारेला घातक असलेल्या मोदी सरकारचे केवळ काही महिनेच शिल्लक राहिले असल्याने या असहिष्णुतेचा अंत आता जनताच करेल अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

अमोल पालेकर यांना भाषण करू न देण्याच्या प्रकाराचा तीव्र निषेध करून सावंत म्हणाले की, असहिष्णु विचारधारा भारतीय नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य संस्थापक बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी हुकुमशहा मुसोलीनीची भेट घेऊन ही विचारधारा भारतात आणली. गोळवलकरांनी हिटलरबद्दल असलेल्या प्रेमातून या विचारधारेची जोपासना केली. संघाच्या विविध शाखांमधून या विचारधारेचा अंमल गेली अनेक वर्ष केला जात आहे. परंतु आता स्वतः संघ प्रचारकच पंतप्रधान झाल्याने शासकीय यंत्रणामार्फत ही विचारधारा रूजवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मॉब लिचिंगच्या वाढत्या घटना, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एस. कलबुर्गी, गौरी लंकेश या विचारवंतांच्या हत्या, कलावंत आणि साहित्यिकांची गळचेपी विरोधकांना देशद्रोही नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न, यंत्रणांचा गैरवापर यातून असहिष्णुता स्पष्टपणे दिसून येत आहे. या सरकारला विरोध सहन होत नाही. प्रसिद्ध साहित्यिका नयनतारा सहगल यांच्याबाबतीतही हेच दिसून आले होते. काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता या असहिष्णु विचारधारेचा निकराने विरोध करेल.  जनतेनेही या असहिष्णु सरकारमुळे लोकशाहीला निर्माण झालेला धोका ओळखला असून आगामी निवडणुकीत या सरकारचा अंत निश्चित आहे असे सावंत म्हणाले.

Previous Post

१२ फेब्रुवारीला  सारसोळेच्या खाडीमध्ये बामणदेव मार्गावर राबविले जाणार स्वच्छता अभियान

Next Post

डान्सबारविरोधी सरकारने त्वरीत सक्षम कायदा करावा : पनवेल संघर्ष समितीच्या निषेध सभेत फुंकले रणशिंग

Next Post
डान्सबारविरोधी सरकारने त्वरीत सक्षम कायदा करावा : पनवेल संघर्ष समितीच्या निषेध सभेत फुंकले रणशिंग

डान्सबारविरोधी सरकारने त्वरीत सक्षम कायदा करावा : पनवेल संघर्ष समितीच्या निषेध सभेत फुंकले रणशिंग

शहरातील मुलाला गावाकडच्या बापाची किंमत राहिली नाही…

लोकसभा निवडणूकांअगोदर भाजपला शेतकऱ्यांची आली आठवण

बामणदेव मार्गावरील सफाई अभियान उत्साहात

बामणदेव मार्गावरील सफाई अभियान उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com