• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 13, 2018

मग शेतकऱ्यांबाबतच शिवसेनेला मंत्रिमंडळात कंठ का फुटत नाही?

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले!: विखे पाटील

अवनी वाघिणीसंदर्भात नौटंकीवरून राधाकृष्ण विखे पाटील यांचे टीकास्त्र

मुंबई : अवनी वाघिणीवरून आज शिवसेना मंत्रिमंडळात आक्रमक होण्याची नौटंकी करते आहे. मात्र महाराष्ट्रात गेल्या ४ वर्षांमध्ये १३ हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या; तेव्हा मंत्रिमंडळाच्या एकाही बैठकीत शिवसेनेला कधी कंठ का फुटला नाही? असा सवाल करून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवनी वाघिणीच्या मृत्युची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी भाजप आणि शिवसेना दोघांनाही धारेवर धरले. ते म्हणाले की, अवनी वाघिणीमुळे प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यातील हजारो नागरिक प्रचंड दहशतीखाली होते. त्यामुळे तिचा बंदोबस्त करणे अनिवार्यच होते. मात्र, तिला वेळीच आणि योग्य पद्धतीने जेरबंद करण्यात सरकार अपयशी ठरले. सरतेशेवटी तिला संशयास्पद पद्धतीने ठार मारण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची आवश्यकता त्यांनी विषद केली.

मागील ४ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या ‘वाघा’चा गळा आवळून धरला आहे. मात्र अधूनमधून दीनवाणीपणे गुरगुरण्यापलिकडे शिवसेना काहीही करू शकलेली नाही. ‘वाघा’चा गळा आवळण्यामध्ये आता भाजप चांगलीच पटाईत झाली आहे. सत्ता जाण्याची भीती दाखवली की, शिवसेनेचा ‘वाघ’ मूग गिळून बसतो. त्याचे नाटकी गुरगुरणे थांबते, हे महाराष्ट्राने अनेकदा अनुभवले आहे, अशी बोचरी टीकाही विखे पाटील यांनी यावेळी केली.

Previous Post

कर्नाटक विकासात आघाडीवर, कारण १० वर्षे बिगर भाजप सत्तेवर – शिवसेना

Next Post

जुईनगरच्या सार्वजनिक उद्यानाच्या सुशोभिकरणाची भाजपच्या विलास चव्हाणांची मागणी

Next Post
जुईनगरच्या सार्वजनिक उद्यानाच्या सुशोभिकरणाची भाजपच्या विलास चव्हाणांची मागणी

जुईनगरच्या सार्वजनिक उद्यानाच्या सुशोभिकरणाची भाजपच्या विलास चव्हाणांची मागणी

राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांवर भाजपाचा हल्लाबोल

राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांवर भाजपाचा हल्लाबोल

पोलिसांच्या लाल फितीत अडकली प्रभाग ९६ ची सुरक्षा

पोलिसांच्या लाल फितीत अडकली प्रभाग ९६ ची सुरक्षा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com