• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 23, 2018

पैशांचे काम असले की सत्तेतून बाहेर पडायच्या धमक्या; राज ठाकरेंचा शिवसेनेवर नेम

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
झेपत नसेल तर सरकारने सत्ता सोडावी

महाराष्ट्रात १८० तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. कोरड्याठक्क जमिनीला भेगा पडतायत, दुष्काळी भागातील लोकं स्थलांतर करतायत, जनावरं हंबरडा फोडतायंत. पण शिवसेनेला राम मंदिर सुचतंय. असले हे ढोंगी राज्यकर्ते नकोच, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. पैशांचे काम असले की सत्तेतून बाहेर पडायची धमकी देतात आणि काम झालं की पुन्हा राजीनामे खिशात घालतात, असा आरोपच त्यांनी शिवसेनेवर केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी यवतमाळमध्ये मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी भाजपासह शिवसेनेवर टीका केली. भाजपावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, मी या दौऱ्यात अमरावतीमधील दुर्गम भागातील एका शाळेत गेलो होतो. त्या भागातील बोलीभाषा कोरकू असून तेथील जिल्हा परिषदेची शाळा मराठी माध्यमाची आहे. शाळेतील शिक्षक हिंदीतून शिकवत असून अशा मुलाचं काय होणार ?, शाळा स्थापनेनंतर ४५ वर्षांनंतर त्या शाळेचा पहिला विद्यार्थी उत्तीर्ण झाला. भाजपा- शिवसेना सरकारने हीच शिक्षणपद्धत राबवली का?. फडणवीस म्हणतात, महाराष्ट्र हागणदारी मुक्त झाला, १ लाख २५ हजार विहिरी बांधल्या. मोदी म्हणाले होते २ कोटी रोजगार देणार, १.५ कोटी घरं बांधली. फक्त खोटे आकडे फेकायचे आणि थापा मारायच्या, इतके धादांत खोटे बोलणारे सरकार पाहिले नव्हते, असे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, दुर्गम भागातील गावकऱ्यांना मी विचारलं, “इथं काय व्हावं असं वाटतं तुम्हाला?” तुम्ही चकित व्हाल असं त्यांनी सांगितलं, “साहेब, एक बँक झाली तर बरं होईल, आता आम्हाला त्यासाठी ५० किमी लांब जावं लागतं.”. दुर्गम भागात अजूनही ही स्थिती असेल तर मग नरेंद्र मोदी, हे कोणतं डिजिटल इंडिया?, असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.

शिवसेनेवरही त्यांनी जोरदार टीका केली. बेरोजगारी आणि दुष्काळाच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. गुराढोरांना चारा नाही, पण शिवसेनेला राममंदिराची काळजी आहे. शिवसेना सत्तेत आहे, पण तरीही ते सरकारवर टीका करतात. उद्धव ठाकरे काय बोलतात कळतंच नाही. सत्तेतून बाहेर का पडत नाही, यावर शिवसेनेकडून सांगितले जाते की आम्हाला सत्तेत राहून सरकारकडून काम करवून घ्यायचंय. पण प्रत्यक्षात पैशांची काम अडकली की सत्तेतून बाहेर पडायची धमकी द्यायची आणि काम झालं की पुन्हा राजीनामे खिशात घालायचे, अशा शद्बात त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.

Previous Post

…तोवर राजकीय गंगा स्वच्छ होणार नाही: शिवसेना

Next Post

ठाणे लोकसभा क्षेत्रात दिड लाख मतदारांची दुबार नोंदणी

Next Post
ठाणे लोकसभा क्षेत्रात दिड लाख मतदारांची दुबार नोंदणी

ठाणे लोकसभा क्षेत्रात दिड लाख मतदारांची दुबार नोंदणी

नेरूळ सेक्टर चारमधील नागरी समस्यांबाबत भाजप आक्रमक

नेरूळ सेक्टर चारमधील नागरी समस्यांबाबत भाजप आक्रमक

पंतप्रधान मोदींची खुर्ची 2019 मध्ये  जाणार – शरद पवार

पंतप्रधान मोदींची खुर्ची 2019 मध्ये जाणार – शरद पवार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com