• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 3, 2018

राष्ट्रवादीकडून मूक आंदोलनातून जुलमी भाजपा सरकारचा निषेध

adminbyadmin
in नवी मुंबई
0
राष्ट्रवादीकडून मूक आंदोलनातून जुलमी भाजपा सरकारचा निषेध
 नवी मुंबई  : केवळ आश्‍वासनांचा पाउस पाडून विकासाची कोणतीही कामे न करता जनतेचे जीणे खडतर करणार्‍या राज्य आणि केंद्रामधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा मंगळवारी देशभर मूक आंदोलन करुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जळजळीत निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी येथील शिवाजी चौकात नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने मौनव्रत धरणे धरण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी त्यांनी दिलेल्या अहिंसेच्या विचारातून शांततामय पध्दतीने सरकारविरोधातील जनतेच्या मनातील आक्रोश या आंदोलनातून व्यक्त करण्यात आला.
आमदार संदीप नाईक, नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, सभागृहनेते रविंद्र इथापे, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, महिला अध्यक्षा माधुरी सुतार, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष ऍड. जब्बार खान, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष दिनेश पारख यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, नगरसेवक, विविध सेलचे प्रमुख, कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
आमदार संदीप नाईक यांनी भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवत हे सरकार केवळ मागील सरकारने केलेल्या विकास कामांवर स्वतःचे लेबल चिटकवत असल्याचे सांगितले. जनतेला प्रचंड यातना होत आहेत. शेतमालाला भाव नाही, बेरोजगारी वाढली आहे,  शेतकरी आत्महत्या करत आहेत, व्यापार, उद्योग सर्वच क्षेत्रात देशाची पिछेहाट सुरु आहे असे टीकास्त्र सोडून जनतेच्या हिताची कोणतीही धोरणे नसलेल्या सरकारला जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास आमदार नाईक यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी देखील सरकारचा बुरखा फाडून भाजपा सरकारने मागील चार वर्षात केवळ फसविण्याचेच काम केल्याचे म्हटले. सरकारकडे विकासाची कोणतीच धोरणे नाहीत. खोटे बोला मात्र रेटून बोला, हेच या लुटारु सरकारचे काम आहे. देशात महागाई गगनाला भिडली आहे असे संांगून आता जनताच या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट केले. या सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष असून आज मुक आंदोलन केले असले तरी या असंतोषाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पेट्रोलचे भाव शंभरीकडे चालले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात पन्नाशीत जरी इंधनाचे भाव गेले तरी त्या विरोधात देशभरात आंदोलने करणारे भाजपाने कलाकार आता कुठे गेले? असा खोचक सवालही जिल्हाध्यक्ष सुतार यांनी केला. 
 देशात महिलांवरील अत्याचार वाढल्याचे सांगून इंधन दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडली आहे. घर चालविणे गृहिणींसाठी कठिण बनले असल्याचे नमूद करुन सरकारच्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीने सातत्याने आंदोलने केली आहेत. आगामी निवडणुकांमध्ये जनता या सरकारला नामशेष केल्याशिवाय राहणार नाही, असे महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार म्हणाल्या. 

 

 
 
 
Previous Post

भाजपा नवी मुंबईच्या वतीने “महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा” वाशी येथे संपन्न

Next Post

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या निधीमधून बांधण्यात आलेल्या 4 बस थांबा निवारा शेडचे उदघाटन सोहळे संपन्न

Next Post
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या निधीमधून बांधण्यात आलेल्या  4 बस थांबा निवारा शेडचे उदघाटन सोहळे संपन्न

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या निधीमधून बांधण्यात आलेल्या 4 बस थांबा निवारा शेडचे उदघाटन सोहळे संपन्न

कुर्ला-मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान दररोज एकाचा मृत्यू

कुर्ला-मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान दररोज एकाचा मृत्यू

पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील – मुख्यमंत्री

'आंबेडकर स्मारकासाठी प्रसंगी राज्य गहाण ठेवू'

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com