• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 19, 2018

आयाराम, गयाराम व घाशीरामांमुळे गोव्यात संकट, गोव्यातील अस्थिरतेला भाजपाच जबाबदार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही- उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीस भाजपाला जबाबदार ठरवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ”गोव्यात भाजपने मोडतोड तांबापितळ एकत्र करून सरकार स्थापन करणे हा लोकशाहीचा अपमानच होता. शेवटी हे नवे राज्य गोव्यास व भाजपास फळले नाही. हे राज्य देवांना व चर्चनांही वाचवता आले नाही. इतकी अराजकता व अस्थिरता निर्माण झाली आहे. पर्रीकर यांना दिल्लीतच ठेवून गोव्यात नवी घडी निर्माण करता आली असती व राज्यही स्थिर चालले असते. तसे झाले असते तर पर्रीकरांनंतर कोण? हा प्रश्न आज निर्माण झाला नसता. गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार आहे. आयाराम, गयाराम व घाशीरामांच्या मदतीने राज्य निर्माण केले की काय घडते ते गोव्यात दिसत आहे”’, अशा शब्दांत त्यांनी भाजपाला टोला हाणला आहे. 

 गोव्यात भाजपाने मोडतोड तांबापितळ एकत्र करून सरकार स्थापन करुन लोकशाहीचा अपमानच केला होता. शेवटी हे नवे राज्य गोव्यास व भाजपास फळले नाही. पर्रिकर यांना दिल्लीतच ठेवून गोव्यात नवी घडी निर्माण करता आली असती व राज्यही स्थिर चालले असते. तसे झाले असते तर पर्रीकरांनंतर कोण? हा प्रश्न आज निर्माण झाला नसता. गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाच्या आजाराने ग्रासले असून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पर्रिकर यांच्या गैरहजेरीत गोव्यात नेतृत्व बदल होणार, अशी चर्चा रंगली आहे. काँग्रेसनेही सत्ता स्थापनेचा दावा करणार, अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर टीका केली.

पर्रिकरांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून ढासळत असून त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन – चार मंत्र्यांच्या प्रकृतीतही बिघाड झाला आहे. त्यामुळे वर्षभरापासून गोव्याचे मंत्रिमंडळ जणू अतिदक्षता विभागातच दाखल झाले. प्रशासन अधांतरी व कामकाज बंद अशा अवस्थेत गोव्यासारखे राज्य सापडले असून राजकीय अस्थिरतेने अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही स्थिती योग्य नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

पर्रिकरांना सन्मानाने निवृत्त करून नवा नेता शोधावा तर भाजपात असा एकही ‘शुद्ध’ भाजपाई नेता नाही. श्रीपाद नाईक हे दिल्लीत आहेत व बाकी एखादा सोडला तर सगळेच भाजपाई हे आयाराम, गयाराम आणि घाशीराम आहेत. सौदेबाजी, तोडफोड करुन भाजपाने गोव्यात सत्ता स्थापन केली आणि नेतृत्व करण्यासाठी देशाच्या संरक्षणमंत्र्यांना म्हणजे मनोहर पर्रीकरांना गोव्यात पाठवले. ही भाजपाची, पर्रिकरांची सगळ्यात मोठी चूक होती, पण यावेळी पर्रिकरांचा सूर लागला नाही आणि गोव्याची गाडी व पर्रीकरांची प्रकृती घसरत गेली, अशी टीका शिवसेनेने केली आहे. गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार आहे. आयाराम, गयाराम व घाशीरामांच्या मदतीने राज्य निर्माण केले की काय घडते ते गोव्यात दिसते, अशा शब्दात शिवसेनेने भाजपाला फटकारले.

Previous Post

भारताचा दुबळ्या हाँगकाँगविरुद्ध अवघ्या 26 धावांनी विजय

Next Post

भारताची पाकिस्तानवर ८ गडी राखून मात

Next Post
भारताची पाकिस्तानवर ८ गडी राखून मात

भारताची पाकिस्तानवर ८ गडी राखून मात

नरेंद्र मोदी आणि अमित शाह संघाच्या वर्गाबाहेरचे विद्यार्थी, राज ठाकरेंची व्यंगचित्रातून टीका

नरेंद्र मोदी आणि अमित शाह संघाच्या वर्गाबाहेरचे विद्यार्थी, राज ठाकरेंची व्यंगचित्रातून टीका

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही- उद्धव ठाकरे

राम मंदिर निर्मितीचे आश्वासन गाठोड्यातून बाहेर काढा - उद्धव ठाकरे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com