• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 7, 2018

24 तासांतच चंद्रकांत पाटलांनी शब्द बदलला

adminbyadmin
in मुंबई
0
काँग्रेसने २०२४ ची तयारी करावी – चंद्रकांत पाटील

मुंबई – भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी 24 तासांच्या आतच आपल्या विधानावरुन पलटी मारली आहे. यापुढे मी कोणतीही विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे पाटील यांनी गुरुवारी म्हटले होते. मात्र, शुक्रवारची सकाळ उजाडताच चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केले. मी राजकीय सन्यास घेणार नाही, असे स्पष्ट करत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे त्यांनी म्हटले. 

कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मोठा निर्णय जाहीर केला. यापुढच्या काळात मी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानं भाजपासह राज्यभरात खळबळ उडाली. कोल्हापूरयेथे पोलीस दलातर्फे गणराया अवॉर्ड वितरण सोहळ्यामध्ये त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याने याचीच चर्चा कार्यक्रमानंतर रंगली. मात्र, या विधानाला अद्याप 24 तासही उलटले नाहीत, तोपर्यंत पाटील यांनी मी राजकीय सन्यास घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरुन 24 तासांतच चंद्रकांत पाटील यांनी आपला शब्द बदलल्याचे दिसून येत आहे. 

 गतवर्षी मंत्री पाटील यांनी साउंड सिस्टीमविरोधात भूमिका घेतली होती. त्याचाच धागा पकडून ते म्हणाले, यापुढे मी लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद किंवा पदवीधर यांपैकी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे गणेशोत्सवात साउंड सिस्टीम लावू नये, हा काही माझा राजकीय अजेंडा नाही. पारंपरिक वाद्य व्यावसायिकांकडून मला काही दहा टक्के कमिशन मिळत नाही. गतवर्षी कोल्हापुरातील गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्ये लावावीत, याबाबत मी अनेक मंडळांना भेटलो, त्यांचे प्रबोधन केले. या विधायक उपक्रमाचा सर्वत्र चांगला संदेश गेला. मात्र, यामुळे काही मंडळे दुखावली गेली. तथापि न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होऊ नये व सण-उत्सवांत नागरिकांचा आनंद द्विगणित व्हावा, हा त्यामागील उद्देश आहे, असेही ते कोल्हापूर येथील कार्यक्रमात म्हणाले होते. 
Previous Post

स्वातंत्र्यदिन गेला, रक्षाबंधन गेले, गणपती जवळ आले, पगार भेटणार तरी कधी?

Next Post

आम्ही समलैंगिक

Next Post
आम्ही समलैंगिक

आम्ही समलैंगिक

नगरसेवकांना महासभेदरम्यान जेवण न देता चिक्की देण्याची भाजपची मागणी

नगरसेवकांना महासभेदरम्यान जेवण न देता चिक्की देण्याची भाजपची मागणी

भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले!: विखे पाटील

सनातन व संघाचे मधूर संबंध, मोहन भागवतांनी खुलासा करावा: विखे पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com