• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 23, 2018

लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवणं बंद केलं होतं, आम्ही नाही : विराट कोहली

adminbyadmin
in देश - विदेश
0
लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवणं बंद केलं होतं, आम्ही नाही : विराट कोहली

 भारतीय कर्णधार विराट कोहलीने बुधवारी नॉटींग्हॅम तिसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर आपल्या संघाने कधीही स्वत:वर विश्वास ठेवणं बंद केलं नव्हतं असं म्हटलं आहे. यासोबत त्याने सांगितलं की, पहिल्या दोन सामन्यांमध्ये इंग्लंड संघाकडून झालेल्या पराभवानंतर अनेकांचा संघावरील विश्वास उडाला होता. भारतीय संघाने इंग्लंडविरोधातील तिसरा कसोटी सामना 203 धावांनी जिंकला आहे.

सामन्यात एकूण 200 धावा करणाऱ्या विराट कोहलीने (97 आणि 103) पुढे बोलताना सांगितलं की, ‘आम्ही मालिकेत 0-2 ने मागे होतो आणि अनेकांचा आमच्यावरील विश्वास उडाला होता. पण आम्हाला स्वत:वर विश्वास होता आणि याचमुळे आता हे अंतर 2-1 झालं आहे. ड्रेसिंग रुममध्ये आम्ही काय विचार करतोय हे महत्त्वाचं असतं. बाहेर लोक काय विचार करतात हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. आता आम्हाला मालिका जिंकू शकतो असा विश्वास आहे’.

‘मालिकेच्या दृष्टीने हा विजय खूप महत्त्वाचा होता. आम्ही सर्वच विभागांमध्ये चांगलं प्रदर्शन केलं. हा संपूर्ण ड्रेंसिंग रुमचा विजय आहे’, असंही विराटने सांगितलं आहे. तिसऱ्या सामन्यात चांगली खेळी केल्याने विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच निवडण्यात आलं.

2014 मध्ये फलंदाजीत अपयशी ठरल्याचं ओझं आता उतरलं आहे का असं विचारलं असता त्याने सांगितलं की, ‘मी 2014 मधील अपयशाचा विचार केलेला नाही. मात्र संघाच्या विजयात मोलाचा वाटा दिल्याने आनंदी आहे’. विराटने पुन्हा एकदा अनुष्काला आपल्या चांगल्या खेळीचं श्रेय दिलं आहे.

‘मी माझी खेळी पत्नीला समर्पित करतो. ती मला नेहमीच प्रेरणा देत असते. तिने भुतकाळात खूप काही सहन केलं आहे, त्यामुळे याचं श्रेय तिलाच आहे. ती नेहमीच मला चांगल्या खेळीसाठी प्रेरणा देत असते’, असं विराटने सांगितलं आहे.

कोहलीने सांगितलं की, गोलंदाजांनीही चांगली खेळी केली आणि फलंदाजांनी योग्य वेळेत योगदान दिलं. संघात कोणतीही भीती नाही आहे. आम्ही चांगल्या धावा केल्या आणि गोलंदाजांनी चांगली खेळी केली. सोबतच स्लिपमध्ये चांगले झेल घेत आम्ही हा सामना जिंकला.

Previous Post

भारताच्या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू बुकीच्या संपर्कात; तपास अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट

Next Post

वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा एमआयएमचा नगरसेवक वर्षभरासाठी तुरुंगात

Next Post
वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा एमआयएमचा नगरसेवक वर्षभरासाठी तुरुंगात

वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा एमआयएमचा नगरसेवक वर्षभरासाठी तुरुंगात

सारसोळेच्या जेटीवर नारळी पौर्णिमेची जय्यत तयारी

सारसोळेच्या जेटीवर नारळी पौर्णिमेची जय्यत तयारी

आमदार संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून कोपरखैरणेतील पालिकेची पहिली  संपूर्ण डिजिटल शाळा

आमदार संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून कोपरखैरणेतील पालिकेची पहिली संपूर्ण डिजिटल शाळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com