• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 22, 2018

बहुमजली इमारतींचे परवाने व सुरक्षा व्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय मानांकित संस्थांकडून अंकेक्षण करा!

adminbyadmin
in मुंबई
0
भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले!: विखे पाटील

क्रिस्टल टॉवर आगप्रकरणी राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

आयुक्तांचे निलंबन तर बिल्डर व इतर दोषी अधिकाऱ्यांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचीही मागणी

मुंबई : क्रिस्टल टॉवर आगप्रकरणी संबंधित बिल्डरसह दोषी महापालिका अधिकाऱ्यांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत आणि महापालिका आयुक्तांना तातडीने निलंबित करावे. त्याचप्रमाणे मुंबई शहरातील सर्व बहुमजली इमारतींना मिळालेले परवाने व इतर संरक्षणात्मक उपाययोजनांबाबत आंतरराष्ट्रीय मानांकित संस्थांकडून स्वतंत्र अंकेक्षण करण्यात यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

विखे पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, क्रिस्टल टॉवर या बहुमजली इमारतीला आग लागून 4 जणांचा मृत्यू होण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. उपलब्ध माहितीनुसार, या इमारतीसाठी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त होण्यापूर्वीच त्याठिकाणी अनेक कुटुंबांचे वास्तव्य सुरू झाल्याचे तसेच इमारतीमध्ये सक्षम अग्निशमन यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. ही वस्तुस्थिती असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे.

मुंबई महापालिकेमध्ये बांधकाम व्यावसायिक, प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या संगनमताने भ्रष्ट व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळेच मुंबई शहरात वारंवार अशा गंभीर घटना घडत आहेत. उपरोक्त नमूद तीनही घटक या माध्यमातून कोट्यवधी रूपये कमावत असून, निरपराध मुंबईकरांना आपले प्राण गमावून त्याची किंमत चुकवावी लागते आहे. मुंबई महापालिकेचा प्रशासकीय कारभार योग्य पद्धतीने व नियमानुसार चालवण्यासाठी जनतेच्या पैशातून त्या ठिकाणी आयुक्त व इतर सनदी अधिकारी नेमण्यात आले आहेत. परंतु, खुद्द महानगर पालिका आयुक्तच गैरकारभाराला खुले संरक्षण देत असल्याने मुंबईतील परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत असल्याचा ठपका राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पत्राच्या माध्यमातून ठेवला आहे.

त्यामुळे मुंबई महापालिकेच्या कारभाराचे आंतरराष्ट्रीय मानांकित संस्थांकडून स्वतंत्र अंकेक्षण करण्याची गरज असून, त्याचा खर्च राज्य सरकारने वहन करावा. मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचारामुळे नाहक बळी जाणाऱ्या मुंबईकरांच्या प्राणांपेक्षा हा खर्च नक्कीच मोठा नसेल, असेही विखे पाटील यांनी नमूद केले आहे.

Previous Post

नवी मुंबई केरला समाजाची आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांजबरोबर बैठक संपन्न

Next Post

आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नका : गणेश नाईक

Next Post
आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नका : गणेश नाईक

आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नका : गणेश नाईक

उन्नत मार्गातील बाधित ठरलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाला मंजुरी

उन्नत मार्गातील बाधित ठरलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाला मंजुरी

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही- उद्धव ठाकरे

काश्मीरमध्ये पुन्हा ‘इसिस’,जबाबदारीची जाणीव होणार का?, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com