• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 21, 2018

वाशी टोल देखील महिन्याभरासाठी टोलमुक्त करण्याची मनसेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
वाशी टोल देखील महिन्याभरासाठी टोलमुक्त करण्याची मनसेची मागणी

* मुलुंड ऐरोली टोलच्या धर्तीवर मनसेने केली मागणी* मागणी मान्य न झाल्यास खळखट्ट्याक

    अमोल इंगळे

नवी मुंबई : मुंबई मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीमुळे ठाणे, मुलुंड, आणि ऐरोली मार्गावर होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे जनक्षोब उसळू लागल्याने कुंभकरणीय झोपेत असणार्‍या सेना भाजप सरकारला अखेरीस नमते घेऊन ऐरोली तसेच मुलुंड टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना महिन्याभरासाठी टोलमाफी जाहीर करावी लागली. याच धर्तीवर सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल देखील महिन्याभरासाठी टोल मुक्त करण्याची मागणी नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सायन पनवेल महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून,दररोज यामुळे वाहतूक कोंडीला लोकांना सामोरे जावे लागते. येत्या आठवड्याभरत सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका महिन्याभरासाठी टोलमुक्त न केल्यास नवी मुंबई मनसे खळखट्ट्याक ने याला उत्तर देईल असा इशारा शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सेना भाजप सरकारला प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

             सुमारे १२२० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला सायन पनवेल महामार्ग हा सध्या सर्वसामान्य करदात्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. शुक्रवार दि.१३ जुलैला सायन पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे सनी विश्वकर्मा आणि कमलेश यादव या दोघांचा अंधारात खड्डे न दिसल्यामुळे अपघात झाला. त्यामध्ये सनी विश्वकर्मा याचा जागीच मृत्यू झाला तर कमलेश जबर जखमी झाला. दि.०५ जुलैला उरण फाटा येथे इब्राहीम खुर्शीद यांचा खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू झाला. खड्ड्यांमुळे निष्पाप लोकांचे जीव जाणे हे अत्यंत गंभीर असल्याचे मनसे उपशहर अध्यक्ष नितिन चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

             त्यातच मुंबई मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीमुळे वाहनचालक सध्या सायन पनवेल महामार्गाचा जास्त वापर करत आहेत. यामुळे सायन पनवेल महामार्गावर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच या महामार्गावरील खड्डे वाहतूक कोंढी होण्यास करणीभूत ठरत आहेत.

            येत्या सात दिवसांच्या आत सरकारने सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोलनाका देखील मुलुंड ऐरोली टोलच्या धर्तीवर महिन्याभरासाठी टोलमुक्त करावा अन्यथा वाशी टोलनाक्यावर नवी मुंबई मनसे खळखट्ट्याक करेल असा जाहीर इशारा नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.

Previous Post

केरळ पूरग्रस्तांना ५० लाखांची मदत करा -आमदार मंदा म्हात्रेंची मुंबई महापालिकेकडे मागणी

Next Post

महाराष्ट्रातील १३ नद्यांमध्ये होणार अटलजींच्या अस्थींचे विसर्जन

Next Post

महाराष्ट्रातील १३ नद्यांमध्ये होणार अटलजींच्या अस्थींचे विसर्जन

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही- उद्धव ठाकरे

भाजपाच्या राज्यात राममंदिराचा फुटबॉल झाला आहे – उद्धव ठाकरे

काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com