• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 9, 2018

ब्रिटिशांच्या विरोधातील लढाईप्रमाणेच ब्रिटिशांची चापलुसी करणा-यांविरोधात लढाई लढावी लागेलः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in मुंबई
0
गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

* मोदी सरकारविरोधात चले जाव आंदोलन करण्याची गरज * राष्ट्रीय एकात्मता व सद्भावनेसाठी काँग्रेसचा तिरंगा मार्च

 मुंबई : स्वातंत्र्यलढ्याला विरोध करून ब्रिटीशांची चापलुसी करणा-यांचे अनुयायी आज सत्तेवर बसून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करित आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जुलमी ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील लढाईप्रमाणेच आजच्या सरकारविरोधात ‘चले जाव’ ची लढाई लढावी लागेल. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले व त्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. चव्हाण म्हणाले की, आजचा दिवस स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणा-या तमाम क्रांतीवीरांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. ऑगस्ट क्रांतीचा लढा आपल्या सर्वांना प्रेरणा व शक्ती देणारा आहे. महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ आंदोलनाची हाक दिली. जात, धर्म, पंथ विसरून देशातील गरीब, श्रीमंत असे सर्व वर्गातील लोक या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाने देशाला राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही मुल्ये दिली. त्यावेळी या आंदोलनाला विरोध करून ब्रिटिशांची चापलुसी करणा-यांचे अनुयायी आज सत्तेवर बसून ही मुल्ये संपवण्याचा प्रयत्न करित आहेत. भाजप सरकारने पुन्हा पारतंत्र्यांसारखी परिस्थिती आणली आहे. देशात 45 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला भाव नाही म्हणून शेतकरी शेतमाल, भाजीपाला, दूध रस्त्यावर फेकतायेत. आरक्षणाच्या मागणीसाठी देशभरात आणि राज्यात विविध समाजाचे लोक रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहेत. महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात बोलणा-यांना देशद्रोही ठरवले जात आहे. लोकांनी काय खायचे? कोणते कपडे वापरायचे? यावर बंधने आणली जात आहेत. माध्यमांची गळचेपी सुरु आहे. गोरक्षणाच्या नावाखाली दलित, अल्पसंख्यांक समाजातील निष्पाप लोकांच्या कत्तली केल्या जात आहेत. जमावाकडून निष्पाप लोकांच्या हत्या केल्या जात आहेत. मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळवत ठेवून मराठा विरूध्द इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी इतर समाजाच्या नेत्यांना याबाबत विश्वासात घ्यावे व परस्पर सामंजस्याने सरकारचा कुटील डाव हाणून पाडावा. समाजविघातक प्रवृत्तींना चले जाव असे सांगण्याचा संकल्प करून शांतता, अहिंसा, सत्याग्रह, धर्मनिरपेक्ष लोकशाही या मुद्दयांवर अढळ निष्ठा ठेवून त्यासाठी अधिक कटिबध्द होण्याचा आजचा दिवस आहे असे खा. चव्हाण म्हणाले. 

यानंतर राष्ट्रीय एकात्मता व सद्भावनेसाठी ऑगस्ट क्रांती मैदान ते मणीभवन असा तिरंगा मार्च काढण्यात आला व मणीभवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून या मार्चची सांगता झाली. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री आ. नसीम खान, माजी खा. एकनाथ गायकवाड, आ. भाई जगताप, आ. अमिन पटेल, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा, माजी आ. चरणसिंग सप्रा, माजी आ. अशोक जाधव, माजी आ. मधु चव्हाण  प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजन भोसले यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सानपाडा विभागात रस्ते, पावसाळी गटारे व पदपथ सुधारणा

Next Post

भोकरपाडा जलशु्ध्दीकरण केंद्रावर आय.एस.ओ. 9001-2015 गुणवत्ता मानांकनाची मोहोर

Next Post
भोकरपाडा जलशु्ध्दीकरण केंद्रावर आय.एस.ओ. 9001-2015 गुणवत्ता मानांकनाची मोहोर

भोकरपाडा जलशु्ध्दीकरण केंद्रावर आय.एस.ओ. 9001-2015 गुणवत्ता मानांकनाची मोहोर

बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न : आमदार मंदाताई म्हात्रे

घणसोली बसडेपोच्या ठेकेदाराला हाकलण्याची मागणी

कंत्राटी कामगारांना किमान वेतनातील 13 महिन्यांच्या फरकाची रक्कम होणार अदा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com