• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 2, 2018

शिवसेनेच्या ‘टक्केवारी’मुळे मराठी माणसाची अधोगती: नारायण राणे

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
शिवसेनेच्या ‘टक्केवारी’मुळे मराठी माणसाची अधोगती: नारायण राणे

चिपळूण  : मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने मराठी माणसांसाठी काहीही केलेले नाही. शिवसेना नेत्यांची बिल्डरांशी पार्टनरशिप असून यातून शिवसेनेला मिळणाऱ्या टक्केवारीमुळेच मराठी माणसाची अधोगती झाली, असा आरोप नारायण राणे यांनी केला.

चिपळूण येथील माटे सभागृहात बुधवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेने मराठी तरुणांना नोक-या देण्यासाठी काहीही केलेले नाही. उच्चशिक्षण घेऊनही मराठी तरुण बेरोजगार आहे. शिवसेनेमुळे मुंबईतील मराठी माणूस खालसा झाला. मी शिवसेना सोडली याचे कारण सर्वांनाच माहित आहे. मुंबईतील गिरण्या बंद झाल्या. त्या गिरण्यांच्या जमिनी बड्या बिल्डरांना विकल्या गेल्या. त्या बिल्डरांच्या बरोबर शिवसेना नेत्यांची पार्टनरशिप आहे. मातोश्री ही पार्टनर आहे. यात शिवसेनेने जी टक्केवारी घेतली आणि त्यामुळेच मराठी माणसाची अधोगती झाली, असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेला फक्त पैसा कमविणे आणि सत्ता मिळवणे इतकंच कळतं. सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता एवढेच त्यांचे गणित असते. शिवसेनेने दहा ते बारा वेळा सत्ता सोडू अशी घोषणा केली. परंतु त्यांनी सत्ता सोडली नाही. ते अजूनही सत्तेला चिकटून बसले आहेत. त्यामुळे नाणार प्रकल्प रद्द होण्यासाठी शिवसेना सत्ता सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.

नाणार प्रकल्प कोणी आणला? या प्रकल्पासाठी सुरुवातीला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. पण आम्ही विरोध केल्यावर शिवसेनेला जाग आली, असंही त्यांनी नमूद केले. कोकण उद्ध्वस्त होऊ नये म्हणूनच आम्ही नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवला. शिवसेना नेते सत्तेत आहेत. पण नाणारविरोधात ते सत्तेचा त्याग करत नाही. फक्त सत्ता सोडतो असे सांगतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

Previous Post

मुंबईच्या लोकलमध्ये माकडचाळे करणारी टपोरी टोळी गजाआड

Next Post

आमदार संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ गावातील बांचोली मैदानावर उद्या रक्तदान शिबिर

Next Post
आमदार संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ गावातील बांचोली मैदानावर उद्या रक्तदान शिबिर

आमदार संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ गावातील बांचोली मैदानावर उद्या रक्तदान शिबिर

ऐरोलीतील नाटयगृहाच्या कामाला गती मिळणार

ऐरोलीतील नाटयगृहाच्या कामाला गती मिळणार

काळाची पावले ओळखत राज्यात पहिल्यांदाच नवी मुंबई महानगरपालिकेची सी.बी.एस.ई. शाळा

काळाची पावले ओळखत राज्यात पहिल्यांदाच नवी मुंबई महानगरपालिकेची सी.बी.एस.ई. शाळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com