• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 5, 2018

मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा

adminbyadmin
in देश - विदेश
0
हवे तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारतच राहणार!: सचिन सावंत

काँग्रेसची केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

भाजप उमेदवाराने मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने स्वतः लक्ष घालावे

दिल्ली :- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाकडून वारंवार आचारसंहितेचा भंग केला गेला. एकंदरीत निवडणूक यंत्रणा कुचकामी तर ठरलीच, संपूर्ण यंत्रणाच सरकारच्या दबावाखाली काम करते आहे असे चित्र दिसून आले. राज्यातील लोकशाही चुकीच्या हातात असून यापुढील निवडणुका निष्पक्षपातीपणे होतील का? अशी शंका जनतेच्या मनात निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर केले.

आज नवी दिल्ली येथे सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल केली.  देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत, निवडणूक आयुक्त अशोक लवासा व सुनील अरोरा यांच्यासह संपूर्ण निवडणूक आयोगाने काँग्रेस शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले की, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात सत्ता आणि पैशांचा गैरवापर करण्यात आला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान साम, दाम, दंड भेदाची भाषा वापरली आणि भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटून मुख्यमंत्र्यांची भाषा खरी करून दाखवली. या सर्व गैर प्रकारांबाबत तसेच निवडणूक अधिका-यांच्या पक्षपाती भूमिकेसंदर्भात काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली व कारवाईची मागणी केली.

तसेच भाजप उमेदवाराने निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेपेक्षा दुप्पट खर्च केला आहे असा आरोप करून साम, दाम, दंड भेदाची भाषा कुटनितीशी जोडणारे कुटील नितीचा वापरही करू शकतात. स्थानिक अधिका-यांवर आमचा विश्वास राहिला नाही त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगानेच यात लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली यावर शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या सर्व सात मुद्द्यांचे गांभीर्य ओळखून त्यावर उचित कारवाई होईल असे निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले.  भाजप उमेदवाराने केलेल्या खर्चाचे विवरणपत्र उपलब्ध करून दिले जाईल असेही आयोगाने स्पष्ट केले.

या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस यशवंत हाप्पे, रामकिशन ओझा व पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार दामोदर शिंगडा यांचे निवडणूक प्रतिनिधी चंद्रकांत दुबे यांचा समावेश होता.

Previous Post

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयच अस्वच्छतेच्या विळख्यात

Next Post

गॅस व इंधन दरवाढी विरोधात मनसेचे वाशी स्थानकासमोर आंदोलन

Next Post
गॅस व इंधन दरवाढी विरोधात मनसेचे वाशी स्थानकासमोर आंदोलन

गॅस व इंधन दरवाढी विरोधात मनसेचे वाशी स्थानकासमोर आंदोलन

रोजगाराभिमुख होण्यासाठी आगरी-कोळी बांधवांनी एकत्र यावे – आमदार संदीप नाईक

रोजगाराभिमुख होण्यासाठी आगरी-कोळी बांधवांनी एकत्र यावे - आमदार संदीप नाईक

अफवांच्या लाटांमुळे कार्यकर्तेही संभ्रमात

अफवांच्या लाटांमुळे कार्यकर्तेही संभ्रमात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com