• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 24, 2018

वन महोत्सवात 1 लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन – आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी केली पाहणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
वन महोत्सवात 1 लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन – आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी केली पाहणी

 नवी मुंबई :-  महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने वन विभागाच्या पुढाकारातून गतवर्षीप्रमाणेच 1 जुलै पासून ‘वनमहोत्सव’ साजरा करण्यात येत असून जुलै महिन्यात संपूर्ण राज्यभरात 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प नजरेसमोर ठेवण्यात आला आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 1 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

       या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करावयाच्या 1 लक्ष वृक्ष लागवडीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी वृक्षप्राधिकरण सदस्य व महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी तसेच वन विभाग आणि वन विकास महामंडळ यांच्या अधिकारीवर्गासह वृक्षारोपण करावायाच्या संभाव्य ठिकाणांची पाहणी केली व वृक्षारोपणाचे नियोजन केले. या पाहणी दौ-याप्रसंगी आयुक्तांसमवेत सभागृहनेते श्री. रविंद्र इथापे, विरोधी पक्षनेते श्री. विजय चौगुले, नगरसेवक डॉ.जयाजी नाथ, श्री.बहादूर बिस्ट, श्रीम. उषा पाटील आदी वृक्ष प्राधिकरण सदस्य तसेच वृक्ष प्राधिकरण सचिव उपआयुक्त श्री. तुषार पवार, वन विभागाचे अधिकारी श्री. देशमुख, वन विकास महामंडळाचे अधिकारी श्री. गौड आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

      यामध्ये इलठणपाडा, यादवनगर, रबाले, सुलाई माता डौगर व गवळीदेव डोंगर परिसराची पाहणी करून त्याठिकाणी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले. सदर भाग हा वन विभागाच्या अखत्यारित असल्याने वन विभाग व नवी मुंबई महानगरपालिका आणि वन विकास महामंडळ यांनी त्रिपक्षीय करार करून हे वृक्षारोपण करावे यादृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सदर पाहणी दरम्यान गवळीदेव पर्यटन स्थळ विकसित करणेबाबतही विचारविनीमय करण्यात आला व त्यादृष्टीने पाहणी करण्यात आली.

      1 जुलै 2018 पासून सुरू होणा-या वन महोत्सवामध्ये नागरिकांना  मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेऊन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनावर भर दिला जाणार आहे. यादृष्टीने पावसाळी कालावधीत आपल्या आवारात वृक्षारोपण करू इच्छित असणा-या सोसायट्या, वसाहती यांना महानगरपालिकेच्या रोपवाटिकेतून मोफत वृक्षरोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या उपक्रमांतून नवी मुंबईकर नागरिकांमध्ये वृक्षप्रेमाची व पर्यावरण संवर्धनाची जाणीव जागृती करण्याचा मनोदय महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

सर्वच क्षेत्रात महिला प्रभावीपणे कार्य करत आहेत – पालकमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

पुढील अडीच वर्षे देखील करवाढ नाही – गणेश नाईक

Next Post
पुढील अडीच वर्षे देखील करवाढ नाही – गणेश नाईक

पुढील अडीच वर्षे देखील करवाढ नाही - गणेश नाईक

पनवेलमधून सव्वा लाखाचा गुटखा हस्तगत

पनवेलमधून सव्वा लाखाचा गुटखा हस्तगत

नाणारवासियांना फसणवीस सरकार फसवत असून ती भाजप शिवसेनेची मॅच फिक्सिंग आहे – अशोक चव्हाण

नाणारवासियांना फसणवीस सरकार फसवत असून ती भाजप शिवसेनेची मॅच फिक्सिंग आहे - अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com