• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 20, 2017

समुह विकास योजनेत प्रकल्पग्रस्तांच्या हरकती व सुचनांच्या समावेशासाठी लवकरच बैठक

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्र विधीमंडळाने अनेक क्रांतीकारक कायदे तयार केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आमदार संदीप नाईक यांना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची ग्वाही 
डंपिंग ग्राउंडचा भुखंड नाममात्र दराने नवी मुंबई पालिकेला देण्याबाबत 
तात्काळ कार्यवाही करण्याचे शासनाचे आश्‍वासन
नागपूर / प्रतिनिधी
नवी मुंबईच्या जिव्हाळयांच्या प्रशांची सोडवणूक करण्यासाठी आमदार संदीप नाईक हे  शासन स्तरावर आणि विधीमंडळ अधिवेशनामधून सातत्याने प्रयत्नशिल आहेत. विधीमंडळ अधिवेशनात सोमवारी नगरविकास आणि महसूल खात्यावरील पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना आमदार संदीप नाईक यांनी पुन्हा एकदा नवी मुंबईच्या जिव्हाळयाचे प्रश्‍न सोडविण्याची जोरदार मागणी सभागृहात केली. त्यांच्या मागणीवर शासनाने सकारात्मक उत्तर दिले असून समुह विकास योजनेची  अंतिम अधिसूचना काढण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या हरकती आणि सूचनांच्या समावेशाबाबत आपण लवकरच आ. संदीप नाईक यांच्या सोबत बैठक आयोजित करुन प्रकल्पग्रस्तांना दिलासा देवू अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आमदार नाईक यांना दिली तर डंपिंग ग्राउंडचा भुखंड नाममात्र दराने नवी मुंबई महापालिकेला देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्‍वासन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले आहे.
 
*** समुह विकास योजनेत प्रकल्पग्रस्तांच्या हरकती व सुचनांच्या समावेशासाठी लवकरच शासनस्तरावर बैठक
नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या गावठाण आणि विस्तारित गावठाणातील बांधकामांबाबत २०१४ साली शासनाने समुहविकास  योजना लागू केली. मात्र या योजनेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा अंतर्भाव करण्यात आला नव्हता. आमदार संदीप नाईक यांनी या विषयी विधानसभेत  आवाज उठविल्यानंतर प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन शासनाने सभागृहात दिले होते. मात्र ग्रामस्थांशी चर्चा न करता  घाईघाईत ही योजना लागू करण्यात आली. २०१५ पर्यतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत शासनाने अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेत देखील प्रकल्पग्रस्तांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या  संघटनांच्या मागण्यांचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही, याकडे आमदार नाईक यांनी चर्चेदरम्यान सभागृहाचे लक्ष वेधले. २०१५ ते २०१७ या कालावधीत आमदार नाईक यांनी वेळोवेळी स्वतः मुख्यमंत्रयांना भेटून अतिम अधिसूचना काढण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या संघटनांच्या मागण्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी केलेली आहे. सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात १२ डिसेंबर रोजी आमदार नाईक यांनी विचारलेल्या तारांकीत प्रश्‍नाला दिलेल्या लेखी उत्तरात  या संबंधीची अंतिम अधिसूचना लवकरच काढण्यात येणार असल्याचे शासनाने  स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही अंतिम अधिसूचना काढण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या संघटनांच्या सर्व मागण्यांचा अंतर्भाव करुन सर्वसमावेशक हिताच्या योजनोची अंतिम अधिसूचना काढण्याची आग्रही मागणी आमदार नाईक यांनी केली. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी या मागणीवर उत्तर देताना आमदार नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार प्रकल्पग्रस्तांच्या सुचना आणि हरकतींचा समावेश समुह विकास योजनेत करण्याबाबत लवकरच एक बैठक आयोजित करुन प्रकल्पग्रस्तांना दिलासा देवू, अशी ग्वाही दिली. आमदार नाईक यांनी सांगितल्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या मोठया प्रमाणावर सुचना आणि हरकती आल्या आहेत हे मान्य करुन प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधकामे केली आहेत मात्र त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना आहे. या विषयी मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालणार आहे, अशी खात्री देखील नगरविकास राज्यमंत्री पाटील यांनी आमदार नाईक यांना दिली. 
 
*** नवी मुंबई महापालिकेला डंम्ंिपंग ग्राउंडसाठी भुखंड देण्याची तात्काळ कार्यवाही होणार
नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील डंपिंग ग्राउंडची कचरा साठविण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे डंपिंग ग्राउंडसाठी भुखंड मिळावा यासाठी  महापालिकेने शासनाकडे मागणी केली आहे. तुर्भे येथील सध्याच्या डंपिंग ग्राउंडशेजारचा ३४ एकरचा भुखंड शासनाने मंजुर केला आहे. त्या मोबदल्यात १९२ कोटी रुपयांची मागणी महापालिकेकडे केली आहे. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी शासन महापालिका आणि नगरपालिकांना भरघोस अनुदान देत आहे. नवी मुंबई पालिकेकडे डंपिंग ग्राउंडची दुसरी व्यवस्था नसल्याने शहरात दररोज निघणारा हजारो टन कचरा कुठे ठेवायचा? असा प्रश्‍न पालिका प्रशासनासमोर आहे. कचर्‍याचे ढिग साचत असल्याने दुर्गंधी पसरते. त्यामुळे नवी मुंबई पालिकेने मागणीेकेल्याप्रमाणे डंपिंगसाठीचा भुखंड सवलतीच्या किंवा नाममात्र दरात देण्यात यावा, अशी आग्रही मागणी देखील आमदार नाईक यांनी महसूल विभागाच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान केली.
आमदार नाईक यांच्या या मागणीला महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी उत्तर दिले. या मागणी विषयीच्या बाबी तपासून डंपिंग ग्राउंडसाठी नवी मुंबई पालिकेला नाममात्र दराने भुखंड देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची शासनाची भुमिका असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
 
*** आमदार संदीप नाईक यांनी इतर केलेल्या महत्वाच्या मागण्या
प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांचे विद्यावेतन सुरु ठेवा
प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना शिक्षण घेता यावे यासाठी सिडकोने विद्यावेतन योजना सुरु केली. मात्र अलिकडेच ही योजना अचानक बंद केली. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी गेल्या, उदरनिर्वाहाचे साधन गेले. अशा परिस्थितीत त्यांना आपल्या पाल्यांना शिक्षण द्यावे लागत आहे. सिडकोची आर्थिक उलाढाल मोठया प्रमाणात असताना तुटपुंज्या रकमेसाठी ही योजनाच बंद करण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांवर अन्याय असल्याचे आमदार नाईक म्हणाले. एकीकडे राज्यातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन विविध योजना राबवित असताना दुसरीकडे  नवी मुंबई पालिका क्षेत्रातील  प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना देण्यात येणारे विद्यावेतन बंद करुन या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वचिंत ठेवण्याचाच हा प्रकार आहे, असे आमदार नाईक म्हणाले.  प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती योजना पूर्ववत सुरु ठेवण्याचे आदेश तात्काळ सिडकोला देण्यात यावेत, अशी मागणी आमदार नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना केली.
 
**** प्रकल्पग्रस्तांनी धारण केलेल्या क्षेत्राच्या सर्व्हेक्षणाचे काम तातडीने हाती घ्या
प्रकल्पग्रस्तांनी धारण केलेल्या क्षेत्राच्या सर्व्हेक्षणाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी देखील आमदार संदीप नाईक यांनी नगरविकास खात्यावरील चर्चेदरम्यान केली. आतापर्यंत हे सर्व्हेक्षण करण्यात आलेले नाही त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींना सामारे जावे लागते आहे, याकडे आमदार नाईक यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. प्रकल्पग्रस्तांची वाढीव बांधकामे अधिकृत करण्यासाठी त्यांनी धारण केलेल्या  क्षेत्राचे तात्काळ सर्व्हेक्षणाचे काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी आमदार नाईक यांनी केली.
 
*** मुंलुड-ऐरोली ब्रीज ते ठाणे-बेलापूर रोड(भारत बिजली) उन्नत मार्गाचे काम लवकर सुरु करा
मुंबई ते नवी मुंबई व नवी मुंबईतून मुंबईकडे जाण्यासाठी तसेच मुंब्रा, शिळफाटा, व पनवेलकडे जाण्यासाठी ऐरोली मार्गे जावे लागते. त्यामुळे ऐरोली येथे  वाहनांची प्रचंड कोंडी होत असते. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी या परिसरात उन्नत मार्गाची मागणी आमदार नाईक यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली होती. त्या अनुशंगाने एमएमआरडीएने मुलुुंड ऐरोली ब्रीज ते ठाणे-बेलापूर रोड (भारत बिजली) असा उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्नत मार्गाचे काम देखील लवकरात लवकर हाती घेण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली.
Previous Post

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर – उद्योगमंत्री सुभाष देसाई

Next Post

अधिकाराचा गैरवापर होत असल्यास कारवाई करु – राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

Next Post
महाराष्ट्र विधीमंडळाने अनेक क्रांतीकारक कायदे तयार केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अधिकाराचा गैरवापर होत असल्यास कारवाई करु - राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

महाराष्ट्र विधीमंडळाने अनेक क्रांतीकारक कायदे तयार केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऐरोली ब्रीज ते कटाई नाका उन्नत मार्गाचे कामही लवकर सुरु होणार

लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

उच्च न्यायालयाच्या निकालाने भाजपच्या विखारी, खुनशी आणि गलिच्छ राजकारणाला सणसणीत चपराकः सचिन सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com