• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 17, 2017

सलग तिस-या वर्षी महाराष्ट्र भ्रष्टाचारात पहिला का आहे? – सचिन सावंत

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

मुंबई :  सलग तिस-या वर्षी महाराष्ट्र भ्रष्टाचारात पहिला का आहे ? याचे उत्तर चिक्की घोटाळ्याच्या चौकशीवरून लक्षात येत आहे अशी टीका करून काँग्रेस पक्ष या भयंकर घोटाळ्याचा सतत पाठपुरावा करत राहून दोषींना शासन होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

चिक्की घोटाळ्या प्रकरणी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिलेल्या क्लीन चीटवर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले की, बोलताना राज्यातले सरकार ‘क्लीन-चीटर’ सरकार आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला. ज्यांच्याविरोधात तक्रार केली, लाचलुचपत विभागाने त्यांचाच अभिप्राय घेतला. स्वतःच चोरी केलेल्या चोराच्या साक्षीवर एसीबीने या प्रकरणी क्लीन चीट दिली आहे. या खरेदीत प्रचंड मोठा भ्रष्टाचार तसेच नियमांची पायमल्ली झाली असून या संदर्भातले पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देऊन सखोल चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती. या तक्रारीनंतर दोन वर्ष उलटल्यानंतरही या विभागाने काहीही कारवाई  केली नव्हती. फक्त महिला व बाल कल्याण विभागाकडे ही तक्रार पाठवण्यात आली असून, त्यांच्याकडून अभिप्राय मागवण्यात येत असल्याचे थातूर मातूर उत्तर एसीबीकडून देण्यात आले आहे. गंभीर बाब म्हणजे महिला आणि बालकल्याण विभाग हा या प्रकरणासंदर्भात दोषी आहे. त्यामुळे आरोपीकडून स्पष्टीकरण मागण्याची आश्चर्यकारक भूमिका विभागाने घेतली तेव्हाच चौकशी दाबून सरकार क्लीन चीट देऊ शकते असता इशारा आम्ही दिला होता. दुर्देवाने तो खरा ठरला आहे.  206 कोटी रूपयांची महिला बालविकास विभागाने केलेली खरेदी हा केवळ घोटाळा नाही तर दिवसा ढवळ्या घातलेला दरोडा आहे. या घोटाळ्या संदर्भातील पुरावे एसीबीला दिल्यानंतर राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींनी स्वतः ज्यांनी पुरवठा केलेला आहे त्यांच्या नोंदणीकृत कारखान्यात वा कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून रिपोर्टींग केलेले आहे. सर्व रिपोर्टींगचे व्हिडीओ हे अजूनही युट्युबवर आहेत. सूर्यकांता चिक्की पाकिटावरील कस्टमर केअर एव्हरेस्ट इंडस्ट्रीजच्या दर करारावर 9823322798 हा एकच मोबाईल क्रमांक आहे. कंपन्या वेगळ्या पत्ते वेगळे पण मोबाईल क्रमांक मात्र एकच आहे. अशा त-हेच्या अनेक बाबींची खरी चौकशी झाली असती तर यामागे असलेल्या माफियांचा खरा चेहरा जगासमोर आला असता म्हणूनच त्यांना संरक्षण देण्याचे काम सरकार चौकशी दाबून करित आहे.  गोरगरिब मुलांच्या तोंडी चिक्कीतून माती घालणा-या सरकारला जनाची नव्हे तर मनाचीही लाज राहिली नाही असे सावंत म्हणाले.

महिला व बालविकास विभागाने एकाच दिवशी 24 शासन आदेश काढून नियमबाह्य पध्दतीने 206 कोटी रूपयांची खरेदी केली होती. या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला होता. त्याबाबत प्रथम 24 जून 2015 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एसीबीकडे तक्रार दिली व नंतर 30 जून 2015 रोजी एक हजार पानांचे पुरावे दिले आहेत. या संदर्भात एसीबीने दोन वर्ष कोणतीही कारवाई केली नाही. या तक्रारीमध्ये ज्या संस्थाकडून खरेदी केली त्या संस्थानी उत्पादन केल्याचे पुरावे,त्यांच्या बँक खात्याची चौकशी, तसेच उत्पादनाकरता लागणा-या कच्च्या मालाच्या खरेदीचे पुरावे, वीज देयके इत्यादी नऊ मुद्द्यांवर आधारीत चौकशीची मागणी केली होती पण एसीबीने मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली मुख्यालयातील वातानुकुलीत खोलीत बसूनच क्लीन चीट दिली. सदर संस्थाच्या ठिकाणी जाऊन त्याची पाहणी करून त्या संस्था अस्तित्वात आहेत की नाहीत हे पाहण्याची साधी तसदीही घेतली नाही. राज्यात एक विभाग प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतो आणि दुसरा विभाग मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने त्याला संरक्षण देतो अशी दुर्देवी परिस्थिती आहे असे सावंत म्हणाले.

या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे या आपल्या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम आहे. काँग्रेस पक्षाकडे असलेल्या पुराव्यावर कोणासोबतही चर्चा करायला काँग्रेस पक्ष तयार आहे. या प्रकरणात लाचलुचपत विभागाने जी चौकशी केली त्याचे सर्व तपशील जाहीर करावेत. एसीबीची क्लीनचीट ही विभागाच्या मंत्र्यांसाठी भूषणावह नसून सरकारचे किती अधःपतन झाले आहे याचे प्रमाणपत्र  आहे असे सावंत म्हणाले.

Previous Post

लॉकर सुरक्षेबाबत पोलिसांकडून बॅकांची शिकवणी

Next Post

​​​भारतरत्न लता मंगेशकर खारघरच्या प्रेमात!

Next Post
​​​भारतरत्न लता मंगेशकर खारघरच्या प्रेमात!

​​​भारतरत्न लता मंगेशकर खारघरच्या प्रेमात!

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवासासाठी एनएमएमटी बसेसचे मोफत पास देण्याची युवा सेनेची मागणी

परिवहन विभागाच्या कारभारावर शिरीष ॠतुचाच पाच वर्षे करिश्मा?

तुर्भे एमआयडीसीत मेडेको इंडिया कंपनीतील आग व स्फोटाने रविवारी अग्नितांडव

तुर्भे एमआयडीसीत मेडेको इंडिया कंपनीतील आग व स्फोटाने रविवारी अग्नितांडव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com